*कोकण Express*
*’परिवर्तन कला महोत्सवा’चे कवी अजय कांडर यांच्या हस्ते उद्या उद्घघाटन*
*वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे कणकवलीत आयोजन*
*महोत्सवात उद्या रात्री 9 वा.’अरे संसार संसार’… बहिणाबाईच्या कविता-गाण्यांची सुरेल मैफल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
खान्देशाच्या मातीचा व भाषेचा गोडवा असलेला ‘परिवर्तन कला महोत्सव’ कणकवली येथे आपासून सुरू होत आहे. सांगीतिक कार्यक्रम व दोन उत्तम नाटकांचे सादरीकर या महोत्सवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे याचे करण्यात आले असून आज कवी अजय कांडर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
जळगावसह खानदेशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षंपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. तीन दिवस , एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला खानदेशचा महोत्सव कोकणात पहिल्यांदा होत आहे. महोत्सवाची सुरवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित “अरे संसार संसार” या कार्यक्रमाने दि. २५ रोजी होणार आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील भावसौंदर्य, अस्सल खान्देशी बोली भाषेचा गोडवा असलेला व महाराष्ट्रभर गाजलेला हा कार्यक्रम प्रथमच कोकणात सादर होत आहे. बहिणाबाईंच्या कवितेमागची जन्मकहाणी उलगडून दाखवणाऱ्या या सांगीतिक कार्यक्रमाने महोत्सवास प्रारंभ होत आहे. संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण आहेत .
हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून दररोज रात्री ९ वा आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात होणार आहे. यासाठी कांताबाई व भवरलाल जैन ट्रस्ट चे सहकार्य लाभले आहे. परिवर्तनची नाटके व सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सादर होत असतात. कलात्मक व सर्जनशील निर्मिती हे परिवर्तचे वैशिष्टये आहेत. या साठीच हा महोत्सव रसिकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे . रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वामन पंडित व शरद सांवत यांनी केले आहे .