राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम शाळा मध्ये राबविला जात आहे

राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम शाळा मध्ये राबविला जात आहे

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम शाळा मध्ये राबविला जात आहे*

*कणकवली  : संजना हळदिवे*

राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविला जातोय. त्याचं अनुषंगाने शाळेतील मुलांना शेतात नेऊन त्याची माहिती शालेय मुलांना व्हावी या हेतूने बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. तळकोकणात देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातं आहे. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 या प्रशालेच्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांना बळीराजाच्या शेतात नेऊन तरवा काढणे व लावणी करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. चिमुकल्यांनी तर धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान हे गीत गात तरवा काढला लावणी केली व बळीराजा प्रमाणेच शेताच्या बांधावर बसून न्याहरी केली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा वालावलकर, शिक्षिका वेदा गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश परब, दिपक राऊळ, तुषार ठाकूर, वामन परब, मधुकर परब, अनिकेत परब, मनीष परब, यश परब, विकास गावडे, दिव्या परब, रेश्मा चव्हाण, रुपाली राणे, सुनीता राऊळ, सुवर्णा परब, वेदा राऊळ, राजश्री रामचंद्र परब, राखी परब, राजश्री परब, ममता परब, कीर्ती परब, आदी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!