*कोंकण एक्सप्रेस*
*हिंदुत्व व गोवंश रक्षणासाठी कटिबद्ध असलेले नामदार नितेश राणे*
*गोवंश हत्या बंदीला विरोध करणाऱ्यांच्या शेजारी बसतात उबाठाचे सुशांत नाईक*
*भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील यांची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती*
*देवगड : प्रशांत वाडेकर*
कणकवलीचे शोबाज नेते उबाठाचे सुशांत नाईक त्यांना कणकवलीत काडीची किंमत नाही म्हणून ते देवगड मध्ये येऊन पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्यावर टीका करतात. देवगड मध्ये झालेल्या गाईच्या मृत्यूचे भांडवल करून ते नामदार नितेश राणे यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. वास्तविक नामदार नितेश राणे यांची प्रतिमा हिंदुत्व धर्मरक्षक, गोवंश रक्षक अशी आहे. यामुळे त्यांच्याकडून अशा कोणत्याही प्रकारासाठी कोणत्याही व्यक्तीची पाठराखण होणार नाही. असे मत देवगड शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले व सुशांत नाईक यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे
पालकमंत्री नितेश राणे यांनी ताबडतोब या घटनेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रशासनाला पालकमंत्री म्हणून दिले आहेत. त्या प्रकारे तिघांना याबाबत शोकॉज नोटिसा काढण्यात आल्या असून यथावकाश सर्वांवरच कारवाई होणार आहे. पालकमंत्री यांचा या विषयात लक्ष नाही ही बाब अत्यंत खोटी आहे. हा प्रकार घडल्यावर आम्ही जबाबदार सर्व पदाधिकारी तेथे लगेच पोहोचलो होतो.
यामुळे पालकमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वाला व त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला सुशांत नाईक यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. उलट गोवंश हत्या बंदीला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर उबाठाचे सुशांत नाईक बसतात हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे सुशांत नाईक यांनी आपल्या कक्षेत राहूनच, मर्यादेत राहूनच टीका करावी, असे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेसाठी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोसकर, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, सभापती आद्या गुमास्ते, नरेश डांबरी, राहुल सारंग, वैभव करंगुटकर व अन्य उपस्थित होते. याप्रकरणी पुढे जे कोण अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल. ही गाय सर्पदंशामुळे मृत झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्याचे कळते. उद्या याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मात्र केवळ या घटनेचे भांडवल करण्याचा अधिकार उबाठाचे तथाकथित नेते सुशांत नाईक यांना नाही, असे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील यांनी स्पष्ट केले.