*कोंकण एक्सप्रेस*
*आचरा ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रंगला निसर्गरम्य शिवा बीच रिसोर्टला….!*
*कॉलेज कट्टा परिवाराचा पहिला स्नेह आनंद सोहळा आचरा समुद्रकिनारी*
*शिरगांव | संतोष साळसकर*
आचरा ज्युनिअर कॉलेज २००० – २००१ मध्ये प्रथमच १०० टक्के निकाल देणार्यां माजी विद्यार्थ्यांचा अर्थात कॉलेज कट्टा गृपचा पहिला स्नेह मेळावा आचरा पिरावाडी येथील निसर्गरम्य समुद्राच्या सानिध्यात शिवा बीच रिसॉर्ट येथे रंगला. तब्बल २४ वर्षांनी या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले. कॉलेज कट्टा गृपचा पहिला स्नेह मेळावा अविस्मरणीय ठरला.
शुक्रवार ९ मे रोजी सकाळी आचरा ज्युनिअर कॉलेजच्या प्रवेशद्वारावरून वंदन करून सर्व विद्यार्थी आचरा पिरावाडी येथील शिवा बीच रिसॉर्ट येथे पोहोचले.
प्रमुख पाहुणे श्री महादेव हाके सर यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.
शिल्पा परब हिने गायिलेले ईशस्थवन, दिप प्रज्वलन यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री महादेव हाके सर यांनी सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर होणार्या हजेरी प्रमाणे हजेरी घेतली. तसेच त्यांच्याच हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.
*महादेव हाके, शिल्पा गांवकर, रघुनाथ कोयंडे यांचा विशेष गौरव*
आचरा ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्या १०० टक्के निकालामध्ये महत्त्वाचे योगदान असणार्या व मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक, सेवा निवृत्त प्राध्यापक महादेव हाके यांचा यावेळी शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
तसेच याच १०० टक्के निकाल देणार्यां बॅच ची विद्यार्थीनी सध्या दिव्यांग महाराष्ट्र संघातील प्रतिभावान खेळाडू शिल्पा गांवकर- डोंगरे हिचा हि यावेळी शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
नौदलात बंदर निरीक्षक म्हणून काम करत असलेले शिवा बीच रिसोर्टचे रघुनाथ कोंयडे यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
*व्यसना पासून दुर रहा – महादेव हाके*
माझ्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा २५ वर्षांनी हजेरी घेण्याचा प्रसंग आनंद दायी आणि नाविन्यपूर्ण होता. शालेय जिवनातील त्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित येण, विचारांची देवाणघेवाण करण, सुख दुःख मित्रांच्या समोर मांडण, व्यक्त होण याच्या सारख्या आनंदायी प्रसंग जिवनात दुसरा असेल अस वाटत नाही. आपल्या मनातील विचार मित्रांन समवेत मोकळ करतो त्यावेळी आपल्या मनावरील ओझ हलक करतो. माझे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवत आहेत हे पाहून मला अभिमान वाटतो आहे. मी सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असताना आचरे कर्मभूमीत माझ्या व्यक्तीमत्वाला आकार प्राप्त झाला.अभ्यास आणि तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांनमुळे जिवनात मला खूप यश मिळाले. राज्य पातळीपर्यंतची तज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. बारावीचा पुनर्मुल्यांकन अधिकारी म्हणून आपण काम केलं, जिवनातील कडक भूमिकेचा मला फायदा झाला. कडक भूमिकेमुळे पालकांच सहकार्य मिळाले.
शाळा समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मला नेहमी सहकार्याची भूमिका राहिली, पालक पाठिशी असले कि विद्यार्थ्यांना घडवण्यास वेळ लागत नाही. २८ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. सेवानिवृत्त्ती नंतर ५ वर्षांनी आपल्या समोर बोलताना माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपण कायम असेच हसत खेळत रहा.
विद्यार्थ्यांकडून अभ्यास करुन घेणे. वाटाड्याची भूमिका, मार्गदर्शकाची भूमिका शिक्षकाला बजावावी लागते. ती जबाबदारी मी व्यवस्थित रित्या पारपाडली आणि त्या जबाबदारीला तुम्ही साथ दिली म्हणून याचाच परिणाम आपल्या
बॅचने १०० %. निकाल लावला. १०० टक्के निकाल लागल्यानंतर संस्था चालक, पालक प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पाठि वरती दिलेल्या प्रेमाच्या थापेमुळे आमचा उत्साह व्दिगुणित झाला. विद्यार्थी मित्रहो तुम्ही सर्वांनी व्यसना पासून दुर रहा असा सल्ला यावेळी महादेव हाके सर यांनी दिला.
___________——————-
भोजना नंतरच्या सत्रात अनिता बागवे, मेघा वझे, नित्यानंद घागरे, कोमल सकपाळ, शिल्पा परब यांनी कविता, गाणी तर पंडीत बागवे, सुनिता वायंगणकर, मुकेश सावंत, देविदास सावंत, गणेश मयेकर यांनी मनोगते व्यक्त केली. “ये मेरे वतन के लोगो जरा याद करो कुरबानी” या देशभक्ती पर गीताने शिल्पा परब हिने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश सावंत, अनिता बागवे यांनी तर सूत्रसंचालन देविदास सावंत यांनी केले.
यावेळी सुनीता वायगंकर, उर्मिला घाडी, अमित चिंदरकर, बाळकृष्ण आडकर, देविदास भरत सावंत, नित्यानंद घागरे, शिल्पा परब, दिनेश बागवे, सचिन काजरेकर, देविदास भगवान सावंत, गणेश मयेकर, मेघा वझे, जोत्स्ना जाधव, सरिता गोलतकर, रेश्मा दाभोलकर, मुकेश सावंत, शांती सावंत, अनिता बागवे, शीतल कामतेकर, संगीता केळकर, अजय कोयंडे, ललना दत्तदास, निलेश सावंत, चंद्रकांत गोलतकर, पंडित बागवे, एकनाथ साटम, महेश शेट्ये, दशरथ पडवळ, विवेक परब, शिल्पा गावकर, सचिन दळवी, सुदर्शन गांवकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.