*कोंकण एक्सप्रेस*
*महावीरांची पंचशील शिकवण मानवी मूल्ये जपणारी-प्रा डॉ. सतीश कामत*
*फोंडाघाट :गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने भगवान वर्धमान महावीर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी महाविरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यांच्या जीवन कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, महावीरांनी आपले अहिंसा, सत्य, अपरिग्रह, स्वावलंबन आणि क्षमाशीलता हे पंचशील विचार जनमानसात रुजवले. जगातील मानवी मूल्यांचे तत्वज्ञान त्यांनी स्वतः अंगीकारले व त्याचा प्रचार प्रसार केला. प्रत्येक प्राणीमात्रांना या निसर्गात महत्वाचे स्थान आहे. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. सर्व प्रकारची कर्मकांडे ही मानवी मूल्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे महावीरांनी कर्मकांडाला फाटा दिला. मानवाबरोबरच इतर पशू पक्षी, प्राण्यांबरोबर आपण दया भावाने वागले पाहिजे, असे त्यांचे तत्त्वज्ञान होते. हे तत्त्वज्ञान आपण स्वीकारले पाहिजे, तरच आपण सुखी होऊ असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा विनोदसिंह पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापिका कीर्ती पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.