*कोकण Express*
*आमच्यावर विचारधारा ,संस्कार, काँग्रेसचे; अपप्रवृत्तीच्या विरोधात एकत्र या ;संदेश पारकर*
कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समारोप कार्यक्रमाच्या दरम्यान शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले की;
देश घडवण्याचं काम जर कोणी केला असेल तर ते काँग्रेसने केला आहे. आम्ही सुद्धा जन्मताच काँग्रेस विचारायचे पाईक असलेले कार्यकर्ते आहोत. आज पर्यंत आमचा प्रवास शिवसेनेपर्यंत झालेला असला तरी आमच्यावर जे विचारधारा आहे ते संस्कार आहेत ते काँग्रेस विचारायचे आहेत म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसची विचारधारणा कधीच संपणारी नाही भविष्यामध्ये काँग्रेसचेही चांगले भविष्य काळामध्ये नक्की दिवस येतील त्या विचारांबरोबरच राहावं लागेल. या देशाची जडणघडण जी आहे ती काँग्रेसने केली आहे .या कणकवली शहरांमध्ये जी काँग्रेसच्या तरुणांची फळी आज वावरते आहे. ते काँग्रेसच विचार घेऊन काम करते आहे. आज जुनी जे काम क्रिकेटच्या माध्यमातून उभ केला आहे ते स्तुत्य आहे. आपण यापुढे संख्यात्मक न राहता तर गुणात्मक राहिलं पाहिजे आपण एका राजकीय अपप्रवृत्तीच्या विरोधात सगळेजण येऊन लढतो आहे. आणि त्या लढायला कधी ना कधी यश हे येणार आहे. आपण लढाई सोडून चालणार नाही. आपल्याला ही लढाई लढावीच लागेल निकाल काय असेल ते आपल्याला माहित नाही परंतु ते आपण राजकीय अपप्रवृत्तीच्या विरोधात लढायचं काम हाती घेतले ते काम आपण केलं पाहिजे. आपण ह्या लढाईमध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो पाहिजे.
पुढील येणारा हा काळ जो आहे तो संपूर्ण स्थानिक निवडणुकांचा आहे. म्हणून आपापल्या आपले मतभेद बाजूला ठेवून आपण अन्यायाच्या विरोधात एकीने लढलं पाहिजे . ज्या पद्धतीने राहुल गांधींवर टीका केली जाते. दोन निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अपयश आलं त्याच नेतृत्वाने संपूर्ण भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात प्रवास केला अनेक समाजाची अनेक माणसं जोडली गेली पुन्हा एकदा राहुल गांधी यांचा नेतृत्व सिद्ध झालेला आहे .सर्वांनी आपण एकत्र येऊन या अपप्रवृत्तीला गाडण्याचा निश्चय करूया, म्हणून आपण एक संघ लढू तर या नक्की प्रवृत्तीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले आहे यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख अमित सामंत, काँग्रेसचे नेते नागेश मोरये ,शिवसेना युवा नेते सुशांत नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.