*कोकण Express*
*राजकारण्यांकडून वाहने अडवून पैसे मागण्याचे प्रकार दुर्दैवी ; मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे. काल बांदा येथे गावठी बॉम्ब पकडल्याचे प्रकरण ताजे असताना दुसरीकडे इन्सुली येथे काही राजकीय पदाधिकाऱयांकडून वाहने अडवून पैसे मागण्याचे होणारे प्रकारही निंदनीय आहेत. या जिल्ह्याला लागलेली शोकांतिका आहे. अशी खंत मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी व्यक्त करून तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी व तत्कालीन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यासारख्या कर्तव्यदक्ष आणि कर्दनकाळ ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची या सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज आहे. असे मत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, आज जिल्ह्यात राजरोसपणे अवैद्य धंदे चालू आहेत. या जिल्ह्याची बदनामी करण्याचे षड्यंत्र याठिकाणी सत्ताधारी पक्ष करत आहेत. आज तत्कालीन जिल्हाधिकारी श्री उदय चौधरी यांनी भोगवे बीच ब्लू फ्लॅग मानांकनसाठी केलेल्या शिफारशीमुळे जिल्ह्याचे नाव देश पातळीवर आले. त्यांनी कठोरात कठोर निर्णय या जिल्ह्यात घेतले एक सक्षम अधिकारी म्हणून अवघ्या काही दिवसात त्यांनी नाव कमावले परंतु अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या बदली करण्यात आली. आज जिल्ह्याला अशा अधिकाऱ्याची गरज आहे.
बांदा चेक पोस्ट वरून कोट्यावधीची दारूची वाहतूक रात्री केली जाते. गोवा बनावटीची अवैद्य दारू रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात या ठिकाणी असलेले चेक पोस्ट आरटीओ ऑफिस उत्पादन शुल्क पुढची कारवाई करत नाही त्याच प्रमाणे कुठेतरी एक कारवाई दिखावासाठी करायची असेच प्रकार या सावंतवाडी तालुक्यात चालतात या ठिकाणी पोलीस पाहिजे तसे रात्रीचे पेट्रोलिंग करत नाही. म्हणूनच इन्सुली येथे पैसे मागण्याचा घडलेला हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. बघायला गेलो तर याठिकाणी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक हे कठोर निर्णय घेताना दिसत नाहीत ते कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत असेच यावरून स्पष्ट होते त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम या ठिकाणी होत आहेत आज जिल्ह्यात 26 जानेवारीला अनेक उपोषणे झाली उपोषण का करावं लागतं याचं जर आत्मपरीक्षण या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी केलं असतं तर आज उपोषण झाली नसती स्थानिक आमदारही उपोषणा संदर्भात मध्यस्ती करण्यात अयशस्वी ठरले आहेत. असे ते म्हणाले.