*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा यांच्या संकल्पनेतून देशभर जन आशीर्वाद यात्रा काढण्याची निर्णय*
राणेंची जन आशीर्वाद यात्रा ही उद्या संध्याकाळी सिंधुदुर्गात येणारच*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे काय चुकीचे बोलले, राणे ३९ वर्षे शिवसेनेत होते, ठाकरे बोलतात त्याच ठाकरी भाषेत ते बोलले, कारण उद्धव ठाकरेंना ठाकरी भाषा पेलवत नाही. दसरा मेळाव्याची भाषणे काढली तर १०० केसेस होतील. ठाकरी भाषेचा उगम तुमच्याकडून आहे. विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी नारायण राणेंचा हा दौरा आहे. दोन वर्षात न्याय कोकणला दिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे मला समजते. आमदार राजन साळवी, यांनी हा जावई शोध लावला आहे. साळवी हे कुठल्या तरी १ लाख लोकसंख्येच्या देशातील डॉक्टरेट पदवी मिळविलेले इतिहास संशोधक आहेत असा टोला जठार यांनी लगावला. तर आमदार वैभव नाईक यांचा इतिहासाशी काही संबंध नाही अशा शब्दात जठार यांनी या दोन्ही आमदारांवर टीकास्त्र सोडले जर आमदार वैभव नाईक यांना यांनी गुन्हा नोंदवायचा असेल तर संजय राऊतांवर नोंदवावा,असा सल्ला भाजपा माजी आमदार प्रमोद जठार दिला आहे.
कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सभापती मनोज रावराणे, उपाध्यक्ष सोनू सावंत, सुशिल सावंत, बबलू सावंत उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा यांच्या संकल्पनेतून देशभर जन आशीर्वाद यात्रा काढण्याची निर्णय घेतला. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ७ वर्षात घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे, राम मंदीर, जनधन योजना व अन्य कामे लोकांपर्यंत जाऊन सांगा, राहिलेल्या कामांचे आश्वाशीत करा. मुबंई पासून ही यात्रा कोकणात निघाली.आता ही यात्रा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून रत्नागिरी शहर येथून निघेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस जन आशीर्वाद यात्रा होईल, असे प्रमोद जठार यांनी सांगितले.
या यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे अनेक समस्या जनतेने मांडल्या आहेत. महाड पूरग्रस्त समस्या, चिपळूण मध्ये पूरग्रस्तांना भेटून पुढे राणे निघाले होते. हिंदू धर्म रक्षक संभाजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जात असताना दगा फटका दिला. पोलिसांना मी सांगत होतो, नोटीस द्या, अटकेला आम्ही विरोध करत नाही. स्थानिक एसीपी निर्दयीपणे वागत होते. मोगलाईने वागत होते, दरवाजा तोडण्याचे एसीपीने सांगितले. नोटीस द्या, हे ऐकलं नाही. जनतेला कळलं पाहिजे, मोगलाई पध्दतीने राणेंना अटक केली असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. हे लक्षात घेऊन राणेंची आढावा बैठक होऊ नये यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन बैठक घेतली. त्यात त्यांचा व्हिडीओ आला आहे, त्यांची सीबीआय चौकशीची मागणी आम्ही केली आहे,असे जठार यांनी सांगितले.
जन आशीर्वाद यात्रा उद्या सकाळी ९ वाजता रत्नागिरी शहरात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता खारेपाटण आगमन होईल, २८,२९ ऑगस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा होणार आहे. व्यापारी त्रस्त आहेत, लसीकरणाची गरज, उद्योग धंदे बंद आहेत, या समस्या जाणून घेण्यासाठी ते येत आहेत. जिल्ह्यातील आढावा घेऊन मोदींना अहवाल सादर केला जाणार आहे.उद्योग खाते असल्याने कोविड विचार न करता ते फिरत आहेत. भाजप कार्यकर्ते काहीही करणार नाही. मुख्यमंत्री सांगताहेत कोरोना सोबत जगायला सांगितले आहे, त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. उत्स्फूर्त स्वागत होणार आहे. हा राणेंचा जिल्हा त्यामुळे यात्रा होईल, असे जठार यांनी सांगितले.
राजन साळवी यांनी तक्रार केली आहे, इतिहास माहिती घेतली तर टोगा नावाचं बेट आहे. त्या देशाने चांगलं काम करतात, म्हणून सन्मान पूर्वक पदवी दिली. मी जी तुलना केली ती हिंदू रक्षक संभाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊच शकत नाही. त्यावेळी छत्रपतीचे दर्शन घेण्यासाठी चाललो. साळवींची बाळ बुद्धी आहे, वैभव नाईक यांचा इतिहास बदलला आहे, त्याचा संबंध नाही. त्यावर बोलणार नाही. मराठा समाजाचा आम्ही अवमान केला नाही, वैभव नाईक, साळवी तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला चाललो होतो. शिवसेनेला कोकण नाही तर राज्यातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा जठार यांनी दिला.