*कोंकण एक्सप्रेस*
*’संविधान’ निवासस्थान ठरले वंचितांचे आशास्थान; सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांच्याकडून ना. रामदास आठवले यांना शुभेच्छा*
*मुंबई*
भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या ‘संविधान’ या नूतन निवासस्थानाचा भव्य दिव्य उद्घाटन व गृहप्रवेश सोहळा नुकताच मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. हे निवासस्थान आगामी काळात दीनदलित, गोरगरीब, वंचित आणि शोषितांच्या न्याय हक्कांचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
सिंधुदुर्ग आरपीआयच्या वतीने सदिच्छा भेट
या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. रतन भाऊ कदम (खोटलेकर) यांनी मुंबई येथील ‘संविधान’ बंगल्यावर धाव घेतली. यावेळी त्यांनी ना. रामदास आठवले साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि नवीन निवासस्थानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
’संविधान’ नाव आणि सामाजिक महत्त्व
ना. रामदास आठवले यांनी आपल्या निवासस्थानाचे नाव ‘संविधान’ ठेवल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. शोषितांना न्याय मिळवून देणारे हक्काचे ठिकाण म्हणून या बंगल्याची ओळख आता निर्माण झाली आहे.
”ना. रामदास आठवले साहेब हे नेहमीच सामान्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असतात. त्यांच्या ‘संविधान’ या निवासस्थानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा विचार घराघरात पोहोचेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा साहेबांवर विशेष प्रेम असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्याचा विकास आणि पक्षसंघटना अधिक मजबूत करू.”
— रतन भाऊ कदम (खोटलेकर), जिल्हाध्यक्ष, आरपीआय (सिंधुदुर्ग)
यावेळी आरपीआयचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘संविधान’ निवासस्थानामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.


