अखंड भारत ही परंपरा, समाज वारसाची आठवण करून देणारी संकल्पना – सुधीर ठाकूर

अखंड भारत ही परंपरा, समाज वारसाची आठवण करून देणारी संकल्पना – सुधीर ठाकूर

*कोंकण एक्सप्रेस*

*अखंड भारत ही परंपरा, समाज वारसाची आठवण करून देणारी संकल्पना – सुधीर ठाकूर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
अखंड भारत ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून आपल्या प्राचिन इतिहासाची सांस्कृतिक परंपरेची आणि समाज वारसाची आवठण करून देणारी संकल्पना आहे. भारत भूमीने हजारो वर्षे विविध विचार, परंपरा, भाषा आणि संस्कृतींना आपल्यामध्ये सामावून घेतले असल्याचे प्रमुख वक्ते सुधीर ठाकूर यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल वेंगुर्ल्याच्यावतीने वेंगुर्ला येथील पाटकर हायस्कूल येथे १४  ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपिठावर विश्व हिंदू परिषदचे प्रखंड मंत्री आपा धोंड, बजरंग दलाचे तालुका संयोजक मयुरेश पेडणेकर, कार्यकर्ते नवनाथ सावंत, प्रा.विलास गोसावी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!