*कोंकण एक्सप्रेस*
*राहुल गांधी पुण्यात साधणार विद्यार्थिनींशी संवाद; सिंधुदुर्गातून ३६ तरुणींची नोंदणी, नावनोंदणीचे आवाहन*
*सिंधुदुर्ग:*
विद्यार्थिनींना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी, आर्थिक समस्या, वाढती बेरोजगारी आणि सामाजिक समानतेच्या अधिकारांवर सखोल चर्चा करण्यासाठी देशाचे युवा नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या विशेष संवाद कार्यक्रमात ते उपस्थित युवा विद्यार्थिनींना थेट मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता ‘एआयएसएसएमएस (AISSMS) इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड’, गेट नं. १, आर.टी.ओ. मेट्रो स्टेशनजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तर मिळणार दिशा
या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधतील. शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमधील अडचणी, भविष्यातील करिअरविषयक विचार, तसेच विविध सामाजिक परिस्थितींना आणि अन्यायाला आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे, याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.
सिंधुदुर्गातून मोठा प्रतिसाद
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आतापर्यंत ३६ विद्यार्थिनींनी आपली अधिकृत नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील इतरही इच्छुक विद्यार्थिनींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणी कशी करावी?
ज्या विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या क्यूआर (QR) कोड स्कॅनरचा वापर करून ‘छात्रों की गूंज’ मोहिमेअंतर्गत आपली नोंदणी पूर्ण करावी.
अधिक माहिती आणि प्रवासासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी ९८९२०५५८२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.

