*कोंकण एक्सप्रेस*
*सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशीलला आम. निलेश राणेंकडून मदतीचा हात*
*स्व:खर्चातून बंधाऱ्याच्या कामास सुरुवात*
*मालवण ः प्रतिनिधी*
सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशीलच्या बंधारा नसलेल्या किनारपट्टी भागाची काल समुद्राच्या उधाणात मोठ्या प्रमाणात धूप होऊन सुमारे १० मीटर अंतराचा भूभाग समुद्राच्या पोटात गेल्याने याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना माहिती दिल्यावर याबाबत आम. निलेश राणे यांनी दखल घेत तळाशील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी स्व:खर्चाने बंधारा बांधण्यात येईल असे सांगत बंधाऱ्याचे काम सुरु करण्याची सूचना केली. या सूचनेनुसार आज दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत तळाशीलचे ज्येष्ठ नागरिक जयहरी कोचरेकर यांच्या हस्ते तळाशील येथे बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
समुद्री उधाणामुळे तळाशील येथील बंधारा नसलेल्या किनारपट्टीची मोठी धूप झाली आहे. यामुळे मुख्य रस्त्यासह लगतच्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना संपर्क साधून माहिती दिली होती. आम. निलेश राणे यांनी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देत किनारपट्टीचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले होते.आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार राणेंच्या स्व:खर्चातून दत्ता सामंत यांनी तातडीने आज बुधवार पासून तळाशील किनारपट्टीवर दगड पसरून किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी बंधारा उभारण्याचे काम सुरु केले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासमवेत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, माजी सरपंच संजय केळुसकर,जयहरी कोचरेकर, पांडुरंग शेलटकर, संजय तारी, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मुजफ्फर मुजावर, अभिजित सावंत, चंद्रकांत कदम, भुपाळ मालंडकर, राधाकृष्ण टिकम, प्रकाश बापर्डेकर, बबन रेवंडकर, गौरव मालंडकर, कुणाल पाटकर, झकास खवणेकर, स्नेहा कांदळगावकर, जान्हवी पराडकर, विनया रेवंडकर, प्राची बापार्डेकर, गौरवी पाटकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, तोंडवळी तळाशील गावाचे रक्षण करण्यासाठी आम. निलेश राणे कटीबद्ध आहेत. आताच्या युती शासनाच्या काळात ७३० मीटरच्या बंधाऱ्यांची निविदा प्रकीया मंजूर झालेली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व महायुतीच्या सरकारकडून १२ कोटी पेक्षा जास्त निधी या गावाला देण्यात आलेला आहे. तसेच या पुढचा दिड किलोमीटरचा बंधारा मंजूर झालेला आहे, असेही दत्ता सामंत यांनी सांगत येणाऱ्या पुढील काळात या भागासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले.