*कोंकण एक्सप्रेस*
*आचरा उबाठा शिवसेनेतर्फे आज वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा*
*मालवण (प्रतिनिधी)*
अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यात वीज महावितरण कंपनीच्या कारभाराचा पोलखोल झाला असून आचरा दशक्रोशीत गेले तीन दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या आचरा विभागाच्या वतीने आचरे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर उद्या २३ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उबाठा शिवसेना पक्षाचे आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी दिली आहे.
गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वीज वितरणची व्यवस्था कोलमडली आहे. पहिल्याच पावसात आचरा दशक्रोशीतच नव्हे तर तालुक्यातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. आचरा वीज वितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात उबाठा शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आचरे येथील वीज वितरणच्या कार्यालयावर उद्या शुक्रवार दि. २३ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता आचरा तिठा (माणिक राणे यांच्या दुकान नजिक ) येथून आचरा विभागातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व महीला आघाडी, युवासेना व महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा धडक मोर्चा निघणार असल्याची माहिती श्री समीर लब्दे यांनी दिली आहे