*कोंकण Express*
*जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे; ‘गट तट’ असता नय…*
*खासदार नारायण राणे: येणारा निवडणूकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणायच आहे…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे. गट तट असता नयेत. आगामी निवडणूकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणायच असून रत्नागिरी, सिंधुदुर्गत आपल्याला जिंकायचा आहे असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज येथे केले. दरम्यान विजय माझा असला तरी श्रेय हे मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच आहे. भविष्यातील विधानसभा निवडणुक पाहता आपण आत्मपरीक्षण करणं देखील आवश्यक आहे. असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ते सावंतवाडीत आयोजित भाजपचा विस्तार जिल्हा कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते
ते म्हणाले मी मराठवाड्यात जाणार आहे. फडणविसांवर बोलणारा जरांगे, मोर्दीवर बोलणाऱ्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच मोदी, शहांवर जो बोलेल त्याचा निषेध जिल्ह्यात झाला पाहिजे असंही ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले कार्यकर्ता हा भाजपच सैन्य आहे. इतर पक्षांपेक्षा आपला कार्यकर्ता तरबेज आहे. आपल्या बुथवर, तालुक्यात जे मिळवल ते विधानसभेसाठी पुरेसं आहे का? याचा विचार आपण करायला हवा. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. १८ तास ते काम करतात. त्यांच्याकडे प्रदिर्घ असं ज्ञान आहे. २०१४ ला जागतिक अर्थव्यवस्थेत देश ११ व्या स्थानी होता. आज देश पाचव्या क्रमांकावर आहे. ही सोप्पी गोष्ट नाही. भारताला हिणवायणे, निंदा करायचे यांना मोदींनी दाखवून दिलं. २०३० पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०४७ ला १०० वर्ष देशाला होताना एक विकसित देश असणार आहे. २५ कोटी लोकांची गरिबी त्यांनी दूर केली. ८० कोटी लोकांना अन्नपुरवठा केला पुढेही करणार, महिला, तरूण, विद्यार्थ्यांना शेकडो योजना त्यांनी दिल्यात जगात एकमेव असे पंतप्रधान आहेत असं मत राणेंनी व्यक्त केल