*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी : सहकारात उमलते तरुण नेतृत्व*
आपल्या कोकणातील लाल मातीशी इमान राखुन आधुनिकतेची कास धरत ग्रामीण परंपरेचा आदर करणारे व स्वतःबरोबर इतरांनी सुद्धा शिस्तीने वागावं अशी आग्रही भुमिका घेणारे शिस्तप्रिय आणि अभ्यासू नेतृत्व म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर ज्या वेगाने त्यांनी बँकेला आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सहकाराला पुढे नेण्याचं काम सुरू केले ते कार्य निश्चीत कौतुकास्पद आहे. शेतकरी हा ग्रामिण आर्थिक रचनेतील महत्त्वाचा महत्त्वाचा घटक मानून अनेक योजना, सवलतीच्या दरात कर्जे, शेती पुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहीली आहे. यावर्षी ३१०० कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठत पावणे सहा हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. आज महाराष्ट्रातील पहिल्या तीन अग्रगण्य बँकांमध्ये जिल्हा बँकेचे नाव घेतले जाते. हे जरी खरे असले तरी गुणात्मक दृष्ट्या आज सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात प्रथम स्थानी आहे याचे सर्व श्रेय जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना जाते.
मुळात श्री. मनिष दळवी यांनी सहकारात गेली अनेक वर्ष विविध संस्थांवर व विविध पदांवर काम केले आहे. त्यामध्ये श्री क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सोसायटी, होडावडा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या सोसायटीमध्ये अनेक वर्ष संचालक व विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत आहेत सावंतवाडी कंझुमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक, वेंगुर्ला खरेदी विक्री संघाचे पाच वर्षे चेअरमन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, कृष्णाई दुग्ध संस्था होडावडा अशा विविध संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे. निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची देशात किर्ती आहे. कोकणी माणूस कष्टाळू आहे. त्याला स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर तो स्वतःच्या कष्टाने तो आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधेल हा विश्वास तिथल्या तरुणांमध्ये द्यावा यासाठी मनिष दळवी साहेब खुप मेहनत घेत आहेत. सिंधुदुर्ग बँकेच्या प्रगतीच्या वाटचालीत मान. खासदार श्री. नारायण राणे, माजी खासदार मान. श्री. निलेश राणे, मान. आमदार श्री. नितेश राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे ते आवर्जुन सांगतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने विविध डिजीटल माध्यमांतून वृद्ध व आजारी व्यक्तींनां थेट घरपोच बँकींग सुविधा सुरु केली आहे. आणि पुढील काळातही अशा प्रकारच्या नवनवीन सुविधा देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. केवळ बँकेचा फायदा होउन चालणार नाही तर ग्रामिण भागातील सर्वाची आर्थिक उन्नती झाली पाहीजे. यासाठी नोकरीसाठी इतरत्र न जाता असलेल्या संधीचा वापर करुन केंद्रशासन, राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेउन छोटे मोठे रोजगार उभे केले पाहीजेत. आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज गावपातळीवर स्वयंसहायता समुहाच्या माध्यमातून महिलांचे संघटन उभे राहत आहे. त्यासाठी बँकेने ‘महिला विकास कक्षाची’ स्वतंत्रपणे स्थापना करुन स्वयंसहायता बचत गटांना मार्गदर्शन करणे, आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहाण्याचे काम करीत आहे. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रातील काही आर्थिक संस्था व कंपन्या जास्त व्याजदराने सावकारी स्वरुपाचे कर्ज महिलांना वितरीत करीत आहेत. या सावकारी व्याजदरामुळे महिलांना भविष्यात अर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी बचत गटाव्यतिरिक्त या असंघटीत महिलांपर्यंत पोहोचून बँकेच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी ‘बँक सखी’ सारखी योजना सुरु करण्याचा विचार आम्ही केला असून ‘बँक सखी’ च्या माध्यमातून गावातील गरजु असंघटीत महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही करणार असल्याचे त्यांना सांगितले.
केवळ बँकेचा फायदा होउन चालणार नाही तर ग्रामिण भागातील सर्वाची आर्थिक उन्नती झाली पाहीजे. यासाठी नोकरीसाठी इतरत्र न जाता असलेल्या संधीचा वापर करुन केंद्रशासन, राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेउन छोटे मोठे रोजगार उभे केले पाहीजेत. आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते आवर्जुन सांगतात.
कै. केशवराव राणे, शिवरामभाऊ जाधव, ढोलम साहेब व आजपर्यंत असलेले बँकेचे संचालक मंडळ यानी बँकेच्या प्रगतीमध्ये आपले योगदान दिले आहे. प्रत्येक संचालक मंडळाने बँकेच्या विविध धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतांना पुढच्या दहा वर्षानंतर ही बँक कुठे असेल याचा विचार सातत्याने केला आणि म्हणूनच सिंधुदुर्ग बँक वयाने कमी असून सुद्धा आज १०० वर्ष कामकाज केलेल्या जिल्हा बँकांच्या बरोबर सिंधुदुर्ग बँकेचे नांव घेतले जाते ही गौरवाची बाब आहे. सहकार क्षेत्रात मध्ये काम करत असताना मर्यादा आहेत पण या मर्यादांच्या पलीकडे जर जायचं असेल तर आपल्याला ग्राहक सेवेवर भर देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातले ग्राहक जोडावे लागतील. एकंदरीतच शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, उद्योजक, बागायतदार, नोकरदार, कामगार, महिला, बचत गट, विद्यार्थी या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी सर्व समावेशक काम केले तरच प्रगतीची पुढची पावलं टाकणं अगदी सोपे होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने विविध डिजीटल माध्यमांतून वृद्ध व आजारी व्यक्तींनां थेट घरपोच बँकींग सुविधा सुरु केली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या नवनवीन सुविधा देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. केवळ बँकेचा फायदा होउन चालणार नाही तर ग्रामिण भागातील सर्वाची आर्थिक उन्नती झाली पाहीजे. यासाठी नोकरीसाठी इतरत्र न जाता असलेल्या संधीचा वापर करुन केंद्रशासन, राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेउन छोटे मोठे रोजगार उभे केले पाहीजेत. आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करणार असल्याचे दळवी साहेब सांगतात
बँक फेसबुक, इंन्स्टाग्राम, ट्विटर, यु-ट्युब, व्हाटस्अप या सोशल मिडीयाच्या माध्यमातून बँकेच्या विविध ठेव तसेच कर्ज योजनांची माहिती देत असून अश्या प्रकारे काम करणारी महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा बँक असेल. दुग्ध क्रांतीचा ध्यास घेत दुग्ध संस्थांना जलद गतीने व सुलभतेने कर्ज पुरवठा करत जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीवर भर देण्यात आला असून पुढील काही वर्षात दुध उत्पादन १ लाख लिटर इतके करण्याचे ध्येय बँकेने ठेवले आहे.डिजिटल बँकिंग बरोबर शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी शेळीपालन, पोल्ट्री फार्म, पशुधन, वराह पालन, बायोगॅस, गोठा बांधणी, पडीक जमिनीवर लागवड होऊन ओलिताखाली क्षेत्र आणण्यासाठी स्वतंत्र कर्ज योजना, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना अशा प्रकारच्या विविध विविध योजनांच्या माध्यमातून इथला शेतकरी उभा राहावा यासाठी बँक प्रयत्न करीत आहे. याचबरोबरच शेतकरी, फळबागायतदार, मत्स्य उद्योग, व्यावसायिक, नोकरदार यांनाही बँकेने नेहमी सहाय्य केले आहे.