*कोंकण Express*
*शहरात घटलेल्या मताधिक्य बाबत चिंतन करू ; संजू परब*
*अल्पसंख्याक व दलित समाज यांची गैरसमज दूर करू; तर सावंतवाडी मतदारांचे देखील मानले आभार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र
असताना मोठ मताधिक्य अपेक्षित होत. परंतु, अल्पसंख्याक व दलित समाज यांची साथ भाजपला मिळाली नाही. २० पैकी ४ बुथवरच विरोधकांना मताधिक्य मिळाले. त्याचा अधिक असल्यानं आमच मताधिक्य कमी पडलं असं मत श्री. परब यांनी व्यक्त केले. तर ही मत भाजपला का पडली नाही? याच चिंतन करून गैरसमज दूर केले जातील. भविष्यात हे मताधिक्य वाढलेलं दिसेल असा दावा संजू परब यांनी केला. दरम्यान राणेंना मतदानाच्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल जनतेचे मानले आभार.
यावेळी माजी सभापती संदीप नेमळेकर, गोविंद केरकर आदी उपस्थित होते