*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील वीज ग्राहकांना “इन्सेंटिव्ह” मिळण्यासाठी प्रयत्न करेन…*
*कोल्हापूर-बेळगाव रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू…*
*खासदार विनायक राऊत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोनाच्या काळात सुद्धा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी व व्यापा-यांनी आपली वीजबिले नियमित भरली आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये त्यांना “इन्सेंटिव्ह” देण्यात यावा, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार आहोत, अशी माहिती आज येथे आयोजित व्यापारी मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी दिली.
दरम्यान कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वेमार्गासाठी लवकरात लवकर आवश्यक तो निधी आणि परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आपण केंद्रांकडे केली आहे. तसेच त्रुटी दूर करून चिपी विमानतळ लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा यांच्या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी झालेल्या भाषणात व्यावसायिक पी.डी शिरसाट यांनी प्रामाणिकपणे काम करणा-या व्यापा-यांच्या वीज बीलात सुट देण्याची मागणी केली.