*कोंकण Express*
*सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता ही नेहमी राखली गेली पाहिजे – जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर*
कणकवली दि.17मार्च (प्रतिनिधी) माऊली मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता मोहीम , माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 17 मार्च रोजी पार पडली. यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आणि कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्याचा प्रश्न सगळीकडे गंभीर स्वरूप धारण करतोय. शासनाची व निमशासकीय यंत्रणेतली सफाई कामगारांची संख्या पुरेशी नाही. आणि त्या मनाने होणारा कचरा हा प्रचंड प्रमाणात असतो. नैसर्गिक रित्या आणि झाडांचा पालापाचोळा वगरे किंवा आपण नेहमीच्या खाद्यपदार्थांना वापरणारे चहाची ग्लासे ,थंड प्यायची ग्लासे, किंवा अन्य गोष्टी आणि विशेषता हॉस्पिटल वगैरेच्या परिसरामध्ये माणसांचा राबता 24 तास असतो. अशा ठिकाणी होणारा कचरा या सगळ्याचा प्रमाण आणि साफसफाई करणारी यंत्रणा यांच प्रमाण व्यस्त आहे. आणि या व्यस्त प्रमाणामुळे सगळीकडे गावागावात ओगळ आणि बकाल वनसरूप आलेल असत. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत . वेगवेगळी प्रोत्साहनपर बक्षीसे आहेत. त्याच्यासाठी ऐक ठरावीक कालावधी हा कार्यक्रम राबविला जातो. तेवढ्या पूर्ती होते. आणि ते 15 दिवस गेले की परत 350दिवस हा गलिच्छपणा लोकांना अनुभवला येतो. परंतु लोकांना हे आपणच साफ करायला पाहिजे ही भावना निर्माण होत नाही. माऊली मित्र मंडळ आणि राजेंद्र पेडणेकर मित्र मंडळ या टीमने दर आठवड्याला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन जावून अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवते. आज त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील परिसराची स्वच्छता मोहिम राबवायची ठरवलेली आहे. आज सकापासूनच काम सूरू आहे.स्वच्छता मोहिम राबवीत असताना आलेले अनुभव जेवढे मनोरंजक आहेत तेवढे गंभीर आहेत. यंत्रणा राबविताना पुरेशी यंत्रणा जी त्या आस्थापनाची आहे. तिकडे राबविलेली नाही. मुळातच पाया सुविधांपासूनच स्वच्छतेची जबाबदारी सार्वजनिक उपक्रमांत मदत करायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना करावी लागते. त्यामुळे कार्यकर्ते मदतीला घ्या. परंतु जी यंत्रणा आहे. ज्या आस्थापनाची माणसे आहेत. त्यांनी सुद्धा स्वच्छतेमध्ये आपणं हून थोडंसं फार लक्ष घालाव आणि थोडा वेळ त्यांच्यासाठी द्यावा.त्यासाठी त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना त्यासाठी मार्गदर्शन करावं. त्याप्रसगी त्यांसाठी शिक्षा ही द्यावी. परंतु सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता ही नेहमी राखली गेली पाहिजे. हाच आदर्श झाला तर माणूस आपल्या घराच्या बाजूला, आपल्या दुकांच्या बाजूला, अन्य ठिकाणीं सुद्धा स्वच्छता मोही आपण राबवू शकतो असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार काका काका करंबेळकर याप्रसंगी म्हणाले
यावेळी माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सुभाष गोविंद उबाळे, सी.आर चव्हाण, निलेश निखार्गे, नामदेव मोडक, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रशांत पाताडे,प्रभाकर कदम, उदय मालप प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर हनुमंते ,परिसेविका प्रिया कदम, औषध निर्माता प्रीती कोरगावकर ,कक्षसेवक सचिन तांबे, सुरक्षारक्षक अमित परब,आदि उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री.किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्वच्छता मोहीम आरोग्य विभागाच्या ठिकाणी राबवत आहोत. आमची 25 स्वच्छता मोहीम होती. ती श्री.तावडे याच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य केंद्राच्या परिसरात राबवली. आणि आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली ती जिल्यातील 30 ही मोहिम आहे. अशीच स्वच्छता मोहीम जेवढी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी राबविणार असल्याचा मानस आहे.
माऊली मित्र मंडळाच्या वतीने आज सकाळपासून 4 तास कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरातील स्वच्छता केली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत असं डॉक्टर विद्याधर हनुमंते म्हणाले…