*कोकण Express*
*कलमठ गावातील समस्या ५ सप्टेंबर पर्यंत सोडविणार…!*
*महावितरणच्या अधिकऱ्यांची ग्वाही…!*
*कलमठ सरपंचाचे आंदोलन तात्पुरते स्थगित…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कलमठ गावातील समस्या ५ सप्टेंबरपर्यंत सोडविणार आहोत.महावितरणच्या अधिकऱ्यांची थेट गावात येवून दोन वेळा बैठका घेत हमी दिली आहे.महावितरणच्या अधिकऱ्यांनी कलमठ गावात जाऊन ४ दिवसात २ बैठका घेतल्या, चर्चा केली. ९० टक्के वीज समस्यांची कामे पूर्ण केली आहेत. ५ सप्टेंबरपर्यंत सोडविणार असल्याची माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली. जे ४ वर्षात मागण्या करुनही झाले ते ८ दिवसांत मार्गी लागली .गावात स्वतंत्र ११ केव्हीसाठी अंदाजपत्रक करुन आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कलमठ गावात ३ एबी स्विच, २ ट्रान्सफॉर्मर, २५ वीज खांब, अवघ्या ८ दिवसांत काम पूर्ण करण्यात आले आहे.त्यामध्ये कलेश्वर नगर, गावडेवाडी,महाजनी नगर,गुरव वाडी,बॅक कॉलनी साठी मनोहर शिल्प नजिक रिंग फिडींग काम सुरु झाले आहे. या परिसरात कणकवली शहर मधून पर्यायी वीज पुरवठा करण्यासाठी उपयोग होणार आहे, उर्वरीत कलमठ गावासाठी स्वतंत्र लाईन साठी नवीन अंदाजपत्रक २ दिवसात केले जाईल असे सहाय्यक अभियंता श्रीराम राणे यांनी सांगितले. त्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल असा शब्द सरपंच संदिप मेस्त्री यांनी दिला.
तसेच गावडेवाडी सोमवारी २०० केव्ही तर बिडयेवाडीसाठी नवीन ट्रान्सफार्मर बसवून झाला आहे. ११ केव्ही लाईन कलमठ मधून आचरा रोड वरील वरवडे,पिसेकामते तर महामार्गावरून जाणवली , हुमरट,साकेडी व इतर गावांपर्यंत वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे कुठल्याही गावात बिघाड झाला तर कलमठ गावात वीज पुरवठा खंडीत होतो.त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या नंतर कलमठ गावाच्या सीमेवर लांजेवाडी, कुंभारवाडी व गावडेवाडी साठी एबी स्विच मंजूर करून बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
भविष्यात इतर गावात कोणताही लाईन बिघाड अथवा पावसाळी आपत्ती मध्ये अब स्विच मुळे कलमठ गावात वीज पुरवठा सुरू राहण्यास मदत होणार आहे. या व्यतिरिक्त गावातील थ्रीफेज लाईन काम पूर्ण झाले असून नवीन वीज खांब साठी मागणी केलेले बिडयेवाडी दत्त नगर, गणेश मंदिर व स्वराज्य नगर,मनोरमा पार्क साठी नव्या स्ट्रीट लाईनचे काम सुरू आहे. ४ दिवसात पूर्ण होईल,शांतादुर्गा नगर, नाडकर्णी नगर वीज खांब काम पूर्ण झाले व सुतारवाडी, गुरव वाडी, टेंबवाडी, सिध्दार्थ कॉलनी ही सर्व कामे ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले.गणेशोत्सव काळात रात्रीचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाईल . यासाठी उपकार्यकारी अभियंता श्री .अत्तार, श्री.बगडे, श्री. प्रकल्प येडगुळकर , श्रीराम राणे अधिकाऱ्यांनी कलमठ ग्रामपंचायत मध्ये दिनांक २९ व ३१ रोजी बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावल्या आहेत. उर्वरीत कामे ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले.
यावेळी चर्चेदरम्यान माजी प.स. सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर , सदस्य दिनेश गोठनकर, नितीन पवार, आबा कोरगावरकर, बाबू नारकर,मिलिंद चिंदरकर,नाना गोठनकर उपस्थित होते.