*कोकण Express*
*मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून भात शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे शेती कुजून नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी शासनाकडे सादर करावेत अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे
गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पचनवृष्टी झाली मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले नदी नाले तुडुंब वाहू लागले असून शेतीमध्ये पाणी घुसून भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तसेच बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाबरोबर कृषी विभागाने ही नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळून देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशार
सांगेलकर यांनी दिला आहे सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे