*कोकण Express*
*रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट*
*काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पडणार पाऊस*
*सिंधुदुर्ग दि. ४जुलै:*
राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढच्या 24 तासांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे व शेतकर्यांनाही पिकांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही मुसळधारा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.