*कोकण Express*
*वीजबिलाच्या संदर्भात मनसेची आक्रमक भूमिका*
*वीजबिल भरण्यासाठी बळजबरी केल्यास गाठ मनसेशी*
*सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री गुरुदास गवंडे यांचा इशारा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मनसेने ही वीजबिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला खडसावलं सोमवार पर्यंत वीज बिले माफ नाही केलीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राज साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन करून महावितरण ला दणका देऊ
वीजबिलाच्या मुद्द्यावर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यात वीजबिल न भरल्याने वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइलनं शॉक देऊ, असा इशाराच मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.
‘लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफ व्हावं यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष सन्मानीय राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहीलं. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा’, असं गुरुदास गवंडे यांनी म्हटलं आहे.
लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही, असं विधान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर वीजबिलाच्या मुद्द्यावरुन रान उठलं आहे. ‘आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ’, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या भूमिकेवर ‘अजब सरकारचा गजब यू टर्न’, असं म्हणत टीका केली आहे. तर सावंतवाडी तालुक्यात कोणताही अधिकारी बळजबरीने वीजबिल घेण्यासाठी अथवा मीटर कापण्यासाठी आला तर मनसेचे कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि याची पूर्ण जबाबदारी एमएसइबीच्या अधिकाऱ्यांची असेल, तसेच हा प्रश्न जनतेच्या आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे आहे त्यामुळे सर्व जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असा इशारा महावितरण ला सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.