*कोकण Express*
*▪️जलसंपदा विभागाच्या सावंतवाडी कार्यालयातील त्या उपअभियंत्याची बदली रोखण्यामागे कोण ?*
*▪️भास्कर परब,माजी सरपंच तेर्सेबाबर्डे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी जलसंपदा विभागामध्ये अनेक कालावधी त्या एकाच जागेवर ठाऺड मांडून बसलेले उप अभियंता श्री संतोष कविटकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली होती.मात्र बदली होऊन.काही महिने झाले तरी त्यांनी चार्ज का ? सोडला नाही,असे काय कारण आहे ? एकाच ठिकाणी अनेक वर्षे कुणाच्या तरी राजकीय वरदहस्ताचा आधार घेऊन थांबणे याचा अर्थ काय?अशा प्रकारातूनच मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत जातात. भ्रष्टाचाराचा उदय होतो.आणि अशा मायाजालामुळे हेच अधिकारी राजकीय वरदहस्ततामुळे सर्व सामान्य जनतेला जुमानत नाहीत,
म्हणूनच जलसंपदा सावंतवाडी विभागातील संतोष कविटकर यांची रत्नागिरी येथे झालेली बदली रद्द का ? झाली.यामागील सूत्रधार कोण ? हेही आमच्या निदर्शनास आले आहे.दोन दिवसांत जलसंपदा मंत्री, उपमुख्यमंत्री.सपर्कमऺत्री,याची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार.
या अधिकाऱ्याच्या कालावधी तील संपूर्ण कामकाजाची चौकशी व्हावी
स्थगिती विरोधात तक्रार करणार.त्याच बरोबर या विभागाच्या या अधिकाऱ्यांच्या कालावधीतील सर्व कामकाजाची
खातेनिहाय चौकशीची मागणी करणार.तसेच जिल्ह्यात शासकीय कार्यालयात एकाच जागेवर अनेक कालावधी असे किती अधिकारी आहेत.याची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच याबाबत आवाज उठविला जाईल.