*कोकण Express*
*जिल्हा नियोजनाची बैठक लावाच परत रत्नागिरीला जायला देणार नाही*
*भाजपा आमदार नितेश राणे यांचा पालकमंत्री सामंत यांना केली सडकून टीक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्याज्या मागण्या केल्या त्या अद्याप पूर्ण नाहीत.त्यामुळे अजून मागणून काय मिळणार.जिल्हा नियोजन ची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावली जात नाही.६ ते ८ महिने झाले ही बैठक झालेली नाही. भविष्यात होईल याची शक्यता नाही.शेतकऱ्यांना मदत नाही तसेच रस्त्यानाही पैसे नाहीत.कुडाळ- मालवण चे आमदार फक्त कोटी,कोटी च्या घोषणा करतात मात्र पैसे खड्ड्यात पडले आणि रस्ते गुळगुळीत झाले असे कुठे दिसत नाही.जिल्ह्याच्या विकासाला कोणच वाली नाही.पालकमंत्री जिल्हात कुठे दिसत नाही की विकास कामे होत नाहीत.आता नाटके सुद्धा सुरू झाली आहेत.पालकमंत्र्यांना नाटके पाहायला आवडतात तेव्हा जिल्हा नियोजनाची बैठक लावाच परत रत्नागिरीला जायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिला.ते पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नांवर बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत केंद्रात मंत्री नितीन गडकरींना जाऊन भेटतात, त्यांच्या समोर शेपूट हलवता
आणि पंतप्रधान मोदींवर टीका करतात.राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हन यांच्याकडून एक रुपया आणू शकत नाहीत. ही यांची लायकी अशी टीका केली.
*ड्रग्सबद्दल बोलणारे शेतकऱ्यांबद्दल कधी बोलणार ?
चपट्या पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवृत्त केलंय. ड्रग्सबद्दल बोलायचं, एनसीबी बद्दल बोलायचं, पण शेतकऱ्यांन बद्दल बोलायचं नाही.ड्रग्स मधील श्रीमंतांची मुले सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीच करायचे नाही.ती काय खातात त्यांचे भविष्य असे असेल या बद्दल बोलायचे नाही.दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या वाईट स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे, असा आरोआम.नितेश राणे यांनी केला.
*सामंत बंधूंची हप्ते वसुली अधिवेशनात मांडणार
पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी मंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत. यासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सेनेच्या राजवटीत बाहेरून एलईडी, परशीशिंग मासेमारी वाढली.कारण हे हप्ते देतात.
