*कोकण Express*
*“त्या”विभागाचे कर्मचारी व अधिकारी त्या दोषींवर कडक कारवाई करणार*
त्या घटनेची सत्ताधारी म्हणून आम्ही जबाबदारी स्विकारतो; बाणे कुटुंबियांच्या आम्ही पाठीशी राहणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील शहरातील बाणे यांच्या किराणामालाच्या दुकानात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक बंबात पाणी नव्हते, ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे बाणे यांच्या झालेल्या नुकसणीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.यापुढे अशी पुन्हा घटना घडणार नाही.तसेच सकाळी मुख्याधिकारी यांच्याशी आमची चर्चा झाली.त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,आरोग्य सभापती अभिजित मुसळे,किशोर राणे, संदीप नलावडे,महेश सावंत,राजू गवाणकर आदी उपस्थित होते.
कणकवली शहरात बाणे यांच्या दुकानाला आग लागली. मी पुण्याला कौटुंबिक कार्यक्रमामुळे होतो,मी तातडीने उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना कळविले.अग्निशामक बंबात पाणी कमी होते,दिलीप बिल्डकाँनच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो.त्यामुळे दिलीप बिल्डकाँन टँकर वाटेत पाणी भरले,अग्निशामक बंब उशिरा आल्याने नुकसान झाल्यास दिलगिरी व्यक्त करतो.आमच्या बंबात पाणी टाकले,नगरपंचायत अग्निशमन बंबामुळेच आग विजवली.तसेच कणकवली नागरिकांचे मी नगरपंचायतच्यावतीने आभार व्यक्त करतो.
घडलेली घटना निंदनीय असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.
“त्या”विभागाचे कर्मचारी व अधिकारी त्या दोषींवर कडक कारवाई होईल.ज्यांनी आरोप केलेत त्यानुसार कारवाई होईल, कोणालाही पाठिशी घालणार नाही.भाजपा व इतर पक्षाचे पदाधिकारी यांनी मदत केली.यापुढे असा प्रकार होणार नाही.अग्निशामक बंब रजिस्टर असेल,पाणी,डिझेल किती यांची तपासणी होईल.ही जबाबदारी माझी व सर्व नगरसेवक यांची आहे.उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी चांगली मदत केली आहे.कर्मचाऱ्यांचे चुकले त्याच्यावर कारवाई होईल.मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा आम्ही केली असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.