*कोकण Express*
*किनारपट्टी भागातील नागरिकांनी सहकार्य करावे*
*तौक्ति वादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी दि.१५-(संजना हळदिवे)*
एका बाजूने कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच तौक्ती वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून वेंगुर्ले मालवण आणि देवगड तालुक्यातील किनारपट्टी भागातल्या नागरिक आणि मच्छीमारांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
