मल्हार पुलावर तात्पुरता साकव करा, किंवा अन्य जागी नवीन साकव उभारा

मल्हार पुलावर तात्पुरता साकव करा, किंवा अन्य जागी नवीन साकव उभारा

*कोकण Express*

*मल्हार पुलावर तात्पुरता साकव करा, किंवा अन्य जागी नवीन साकव उभारा*

*​​कनेडी पंचक्रोशीतील सरपंचांची कार्यकारी अभियंत्याकडे मागणी*

​ *गणेश चतुर्थीपूर्वी कार्यवाही हवी*

​*कणकवली  ः प्रतिनिधी*

​कनेडी – नरडवे मार्गावरील नाटळ मल्हार पूल हा अचानक कोसळल्याने आता नाटळ, दिगवळे, दारीस्ते, नरडवे या प्रमुख गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला असून, त्याबरोबरच अन्य छोटी- मोठी आठ ते नऊ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात हाल होत असून, आर्थिक भुर्दंड पडत आहे.​ ​त्यामुळे पर्यायी व्यवस्था तात्काळ करण्या​संदर्भात ​२७ जुलै रोजी यावरील उपाययोजना करण्याबाबत जि​.​ प​.​ अध्यक्षा संजना सावंत यांनी ग्रा.प.सांगवे येथे आढावा बैठक घेतली होती.​ ​सदर बैठकीमध्ये आपण कोसळलेल्या मल्हार पूलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्यानुसार सदर पूलावर तात्पुरत्या स्वरूपातील साकव करणे शक्य आहे किंवा नाही हे सांगता येइल असे सां​गितले होते. तसेच या​ संदर्भातील अंदाजपत्रकही त्यानंतर करणे शक्य हो​ईल याबाबतही चर्चा करणेत आलेली होती.​ ​याचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करण्याचीही आपण यावेळी ग्वाही दिलेली होती. तथापि अदयाप याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे कनेडी पंचक्रोशीतील सरपंचांनी कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांची भेट घेत निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधले आहे. या ​साकवाच्या पर्यायी व्यवस्थेबाबतही कार्यवाही झालेली दिसत नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये याबाबत साशंकता आहे. पर्यायी साकव ​किती दिवसात ​होईल हे देखील समजत नाही.​ ​जर सदर पूलाचे स्ट्रक्चरल ऑडीट आपल्या यंत्रणेमार्फत झाले असल्यास व सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील साकव केल्यास वाहने दुचाकी, रिक्षा जाण्यायोग्य असा साकव बांधणे शक्य आहे किंवा तसे नसल्यास सदरच्या पूलाजवळच अन्य ठिकाणी अशा प्रकारचा साकव बांधणेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून तात्काळ बांधण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून आता पुलाच्या पलीकडे असलेल्या नाटळ, दिगवळे, दारीस्ते, नरडवे व अन्य छोटी – मोठी गावे या गावातील ग्रामस्थांना सध्या ​उद्भवत असलेल्या समस्या तात्पुरत्या स्वरूपात तरी दूर होतील. आता नजीकच कोकणातील अत्यंत महत्वाचा असा गणेश चतुर्थी स​ण येत आहे. सदर स​णानिमित्त मुंबईहून मोठया प्रमाणत चाकरमानी येण्याची शक्यता आहे. यावेळी पूलाच्या नजीकच तात्पुरत्या स्वरूपातील साकवाची व्यवस्था नसल्यास प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याचीही शक्यता आहे. तसेच सभोतालच्या गावांचा संपर्क तुटल्याने कनेडी बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही सध्या याचा मोठा विपरीत परीणाम होत असून, भविष्यातही तो होणार आहे . तरी वरील नमुद सर्व ​बाबींचा सारासार विचार करून तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर गणेश चतुर्थी सणाच्या आधी मल्हार पूलावर साकव अथवा नजीकच पर्याची ठिकाणी साकव बांधण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी निवेदनाद्वारे कनेडी पंचक्रोशीतील सरपंचांनी कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्याकडे केली आहे. यावेळी नरडवे  सरपंच अमिता सावंत, नाटळ सरपंच सुजाता सावंत, दिगवळे सरपंच सानिका सुतार, दारिस्ते सरपंच संजय सावंत, माजी सभापती सुरेश ढवळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!