वस्तुस्थिती न पाहता नितेश राणे व भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी का करत आहेत?

वस्तुस्थिती न पाहता नितेश राणे व भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी का करत आहेत?

सिंधुदुर्ग:
गेले सात ते आठ महिने सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी करत आहेत.परंतु वस्तुस्थिती पाहता अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातुन बरे होऊन घरी गेलेत, त्यात सामान्य नागरिक व्यापारी,उद्योजक व मी सुध्दा आहे.नितेश राणेंचे अनेक पदाधिकारी, इंजिनिअरिंग कॉलेजचे कर्मचारी यांनी सुध्दा याच रुग्णालयात उपचार घेतले.कोविड पॉझिटिव्ह आलेल्या काहींचा दुर्दैवाने मृत्य झाला.आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर,अधिकारी,नर्स कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत.मात्र गेले सात आठ महिने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या सर्वांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण नितेश राणेंनी मुंबई बसून केले आहे.पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर हे जिल्ह्यात वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत.जिल्हा रुग्णालयातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र उशिराने कोविडसाठी बेड दिलेल्या आपल्या खाजगी हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय? असा सवाल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
आ.वैभव नाईक पुढे म्हणाले,जिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेली औषधे उपलब्ध आहेत.रेमडेसिवीर सारखी महाग व राज्यात तुटवडा असलेली ४५० इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात सध्या उपलब्ध आहेत.लवकरच अजून १ हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.जिल्हा रुग्णालयात टेस्ट संख्या वाढत आहे.स्वतःचा ऑक्सिजन प्लांट येणाऱ्या दोन दिवसांत सुरू होणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये पहिल्यांदाच ९१ बीएएमएस डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे.तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीचे अधिकार आता जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी आमचे काही शासकीय डॉक्टर व कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयावर ताण येत होता.मात्र कोविड वर मात करून आमचे डॉक्टर पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले आहेत.रूग्णांना चांगले उपचार मिळत आहेत. ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.रुग्णांना जेवणाची सोय उत्तम आहे.कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यकींच्या अत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे.त्याबाबतची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार हे सातत्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.ज्या अडचणी येत आहेत त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!