*जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक*

*जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक*

*कोंकण एक्सप्रेस*

*जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक*

*मालवण तालुका आणि चौके विभागातील शिवसैनिकांकडून नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार*

मी आज आमदार नसलो तरी लोकांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच लोकांसोबत आहे. लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर त्यासाठी आंदोलन करण्याची शिवसेना पक्षाची भूमिका असते. आज जिल्ह्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत.जिल्ह्यात चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून आम्ही कुडाळ मध्ये महिला बाल रुग्णालय उभारले.ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरु केले. परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. अदानीच्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू लिलाव न झाल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यासाठी आता तीव्र आंदोलने करावी लागणार आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

मालवण तालुका तसेच चौके विभागातील शिवसैनिक आणि विनोद सांडव मित्रमंडळाच्या वतीने चौके येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे,मनोज मोंडकर,दिनेश चव्हाण, बिजेंद्र गावडे,अजित पार्टे, विनोद सांडव, वंदेश ढोलम, विनायक गावडे,गणेश गावडे,दिनेश कदम,शेखर कदम,महेश धुरी,किरण भिसे,किशोर पाताडे,डॉ. प्रताप पवार,श्री. मसुरकर,श्री. लाड, आदी उपस्थित होते.

हरी खोबरेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला सक्षम नेतृत्वाची गरज होती. उद्धवजींनी वैभव नाईक यांच्या खांद्यावर ती जबाबदारी सोपवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा बळकट होऊन शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!