*कोकण Express*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा घाटरस्ता पूर्णतः बंद…*
*गगनबावडा प्रशासनाचा निर्णय; आपल्या हद्दीत टाकली माती,वाहतूक ठप्प…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गगनबावडा हद्दीत माती टाकून रस्ता पूर्णतः बंद केला आहे. त्यामुळे गगनबावडा खारेपाटण राज्य मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांसह अनेक प्रवाशांना माघारी फिरावे लागले आहे. प्रशासनाने हद्दी बंद करण्याऐवजी ठिकठिकाणी पोलिस चेक नाके तैनात करण्यात यावेत. अशीही मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे.
जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लाखो लोक या रोगाने संक्रमित झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाला घाटमार्ग बंद करुन प्रत्यक्षात काय साध्य करायचे आहे? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. तसेच आजारी रुग्ण असेल तर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर व अन्यत्र ठिकाणी घेऊन जाण्यासाठी करुळ घाट मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यातूनच रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण? भुईबावडा दशक्रोशीतील लोकांना भुईबावडा घाट जवळचा आहे. करुळ घाटमार्गे जाण्यासाठी ४० कि. मी. अंतर पार करावे लागणार आहे.
गगनबावडा प्रशासनाने आपल्या हद्दी माती टाकून रस्ता बंद केल्याने भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांसह अनेक प्रवाशांना माघारी फिरावे लागले आहे. प्रशासनाने हद्दी बंद करण्याऐवजी ठिकठिकाणी पोलिस चेक नाके तैनात करण्यात यावेत. अशीही मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे.