पालकमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांचीही मते लक्षात घ्यावी ; खासदार नारायण राणे*

पालकमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांचीही मते लक्षात घ्यावी ; खासदार नारायण राणे*

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांचीही मते लक्षात घ्यावी ; खासदार नारायण राणे*

*कणकवली ः संजना हळदिवे*

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये युती करायची असे आमचे जवळपास ठरले आहे. युती व्हावी ही माझी इच्छा आहे. युती होणार की नाही याबाबत पालकमंत्री नितेश राणे एकट्यानेच निर्णय घेऊ शकत नाहीत. रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली मते मांडत असून मी खासदार म्हणून माझे मत मांडत आहे. नीतेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी युती करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मतेही लक्षात घ्यायला हवीत, असे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले.  प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप पदाधिकारी महेश सारंग, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!