*कोंकण एक्सप्रेस*
*पत्रकार तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर*
*वैभववाडी ः संजय शेळके*
मागील 25 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे.तानाजी कांबळे हे अन्याय,अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी,विकासासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रतिवषीऀ अत्यंत महत्त्वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिला जातो.महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : पुरस्कार -2025 /प्र.क्र.36 दिनांक 6 जुन 2025 अन्वये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, नामदार संजयजी शिरसाट यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. महापुरुषांच्या विचारांवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. गेली 25 वर्ष ते पत्रकारितेमध्ये कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केलेली आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून तानाजी कांबळे यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी जिवाची पर्वा न करता संघर्ष केलेला आहे.अन्यायाच्या विरोधात सरकार पातळीवर वाचा फोडण्याचे काम ते अविरत करीत आहेत .शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अपंग व इतर घटकांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे..
सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्त आहेत. लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठवला होता. तंटामुक्त समितीचे ते अध्यक्षही होते