20 मे पासून वेंगुर्ला तालुक्यात वीज वितरणचे वाजले तीन तेरा, लाईट नसल्याने नागरिक झाले हैराण

20 मे पासून वेंगुर्ला तालुक्यात वीज वितरणचे वाजले तीन तेरा, लाईट नसल्याने नागरिक झाले हैराण

*कोंकण एक्सप्रेस*

*20 मे पासून वेंगुर्ला तालुक्यात वीज वितरणचे वाजले तीन तेरा, लाईट नसल्याने नागरिक झाले हैराण*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

जिल्हा बैंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या सहित लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेंगुर्ला वीज वितरण कार्यालयात धडक देत कुडाळ कार्यकारी अभियंता वनमोरे यांना जाब विचारला. पावसाळ्यापूर्वीच वीज वितरणची अशी अवस्था असेल तर पावसाळा हंगामात काय होणार? असा सवालही यावेळी उपस्थितांनी केला.

वेंगुर्ले येथे गेले २० मे पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युत वितरण विभागाचा बोजवारा उडाला आहे. पहिल्याच पावसात वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी हैराण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वेंगुर्ले विद्युत वितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी उपस्थित जिल्हा बैंक अध्यक्ष मनिष दळवी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पावसाळ्यापूर्वीची कामे योग्य प्रकारे न केल्याने ही परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी घेतला. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. वेंगुर्ला वीज वितरणचा उपअभियंता समर्पक उत्तरे देत नाही. फोन बंद करून ठेवतात. तालुक्यात काय परिस्थिती आहे याची त्यांना काळजी नाही. वीज वितरणचा मेंटेनन्स करण्यासाठी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने कोणती कामे केली याची उत्तरे द्या आदी विषयांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी जिल्हा बैंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासहित भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुस्कर, सायमन आल्मेडा, नंदन वेंगुर्लेकर, रवींद्र खानोलकर आक्रमकणई, युवासेनेचे विशाल गावडे, सेनेचे संदीप पेडणेकर, पंकज शिरसाट, बाळू परब तसेच ग्रामस्थ महेश प्रभूखानोलकर, अनंत परब, संतोष तेंडुलकर, डुल सुरज कांबळी, संजय मेस्ली यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!