*कोंकण एक्सप्रेस*
*उद्याच्या भविष्यासाठी सायबर धोक्यापासून सावध राहा : श्री मंदार वैद्य*
*मालवण : प्रतिनिधी*
आपले भविष्य उज्वल असून इथून पुढे घडणाऱ्या पिढ्या या सुसंस्कृत झाल्या पाहिजे यासाठी आज जगातील बऱ्याच धोक्यापासून आपण सावध राहिले पाहिजेत.यामधील महत्त्वाचा धोका मोबाईल पासून असून वेळीच आपण सावध होऊया असे उद्गार वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या ठिकाणी संपन्न झालेल्या” सायबर भान” या कार्यक्रमात कट्टा या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुर येथील प्रसिद्ध व्याख्याते श्री मंदार वैद्य यांनी मार्गदर्शन पर उद्गार काढले.क.पं.शि.प्र.मंडळाच्या तिन्ही शाखा यामध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा,वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल,डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्ट्याच्या इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या किशोर अवस्था तसेच युवा अवस्थेतील मुलांच्या/ मुलींच्या मध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदलाचा अभ्यास करून आपल्या वक्तृत्व कौशल्याने श्री मंदार वैद्य सर यांनी मुलांना बोलते केले तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारातील वैयक्तिक मोबाईल वापराची माहिती काढून घेतली व त्यामधील धोके सांगताना प्रश्नोत्तराच्या शैली मधून विद्यार्थ्यांना प्रवृत्त करताना एखादी चुकीची गोष्ट मांडण्याचे धाडस निर्माण केले. आपली होणारी चूक ही चूक आहे का? याचे ही भान नसणाऱ्या मुलांना मोबाईलच्या वापराचा योग्य मार्ग दाखविला. मोबाईल चां वापर करताना आपल्याला सावधगिरी किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देताना हा सायबर गुन्हे वाढताना दिसतात .नकळत होणाऱ्या या चुका आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करतात व पुढे जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करतात यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात आलेली एक चळवळ असून त्यासाठी अभिप्रेत असणारा समाज घडवूया असे आव्हान या मार्गदर्शना च्या माध्यमातून करण्यात आले.श्री मंदार वैद्य यांनी मोबाईलच्या अतिवापरा संदर्भात व्हिडिओ, एडिटिंग मार्क म्हणजे दुसऱ्याचा चेहरा वापरून करण्यात येणारे कृती, मोबाईलचे अंधकारमय जग म्हणजे व त्यातील होणाऱ्या चुका पुढे त्यातून निर्माण होणारे गुन्हे तसेच या माध्यमातून होणारे अल्पवयीन बाल गुन्हेगार ,युवा गुन्हेगार व आता होऊ घातलेले गुन्हे या विषयी माहिती देत असताना मोबाईल पासून दूर राहून गरजेचे असणाऱ्या बाबीव्यतिरिक मोबाईलचा अतिवापर व सायबर गुन्ह्याबाबतीत कोणत्या प्रकारे सावधगिरी बाळगावी याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील हितचिंतक पालक माजी विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन या कार्यक्रमाच्या यशस्वीते बद्दल समाधान व्यक्त केले.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून चालवलेला हा प्रयत्न असून विद्यार्थी कल्याणाकरीता असे उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असून त्या प्रमाणे कार्यवाही सुरू असून भविष्यात सकारात्मक बाबी वर भर असेल असे आश्वासन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अजयराज वराडकर यांनी दिले. तसेच पंचक्रोशीतील हितचिंतक माजी विद्यार्थी
यांनी अशा संधीचा लाभ घेऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर सचिव श्रीमती विजयश्री देसाई सचिव श्री सुनीलजी नाईक ,माजी मुख्याध्यापक श्री अनिल फणसेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक ऋषी नाईक तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री महेंद्र मिराशी त्याचबरोबर तिन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.