महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार

महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार

कोंकण_Express

महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला,

मोदी, शहांचा निर्णय मान्य सरकार बनविताना अजिबात अडसर ठरणार नाही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचंड मोठा निर्णय

माझ्या सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती नशीबाने मिळते एकनाथ शिंदे

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.मात्र, महायुतीत पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपाने शिंदेना स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.

“आता माझी अडचण होणार नाही, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शब्द दिला आहे.” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. तसेच, माझा पूर्ण पाठींबा हा भाजपला असणार असल्याचेदेखील त्यांनी केले स्पष्ट

दरम्यान, एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते. पण त्याऐवजी ठाण्यातील आपल्याच निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेतली.

मी प्रचारात ८० ते १०० सभा घेतल्या. प्रवास केला. पायाला भिंगरी लावून काम केले. काल कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. मुख्यमंत्री नव्हतोच मी कॉमन मॅन म्हणूनच काम केले एकनाथ शिदे

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मंगळवारी सकाळी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येऊन पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेत रुद्राभिषेक केला.अन् मुख्यमंत्रिपद पुन्हा शिंदे यांनाच मिळावे,यासाठी साकडे घातले.व आरती केली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम आहे.यादरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर आपण समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी मोदींना फोन केला आणि माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुतीचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे,”आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. आम्ही लढून काम करणारे आहोत. महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला, त्याची ऐतिहासिक अशी गणना होते. माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करेन.मला काय मिळाले त्यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी आहे, असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला.*

स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे बोलले गेले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय होत नसल्याने सेना-भाजप अशा दोन्ही पक्षांत नाराजी होती. आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी सेना-भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आग्रही होते. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट निरोप देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली.*

मी मनमोकळा माणूस आहे. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. सरकार बनविताना माझ्यामुळे अडचण आहे, असे तुमच्या मनात आणू नका. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केले, त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.*

अडीच वर्षात महायुतीने केलेल्या कामाला यश आले. त्यामुळे लोकांनी विश्वास दाखवला. महाविकास आघाडीने थांबविलेली कामे आम्ही पुढे नेली. दुसरीकडे कल्याणकारी योजनांची आणि विकासाची आम्ही सांगड घातली. त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही महायुतीच्या लोकांनी सगळ्यांनीच निवडणुकीत प्रचंड काम केले. पहाटेपर्यंत मी काम करायचो. दोन तीन तास झोपल्यानंतर पुन्हा सभा घ्यायचो. लोकांच्या भेटीगाठी सुरू होत्या. मी प्रचारात ८० ते १०० सभा घेतल्या. प्रवास केला. पायाला भिंगरी लावून काम केले. काल कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. मुख्यमंत्री नव्हतोच मी कॉमन मॅन म्हणूनच काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी काही ना काही केले पाहिजे, अशी माझी धारणा होती. मी देखील सर्वसामान्य घरातून आलेलो आहे. माझी परिस्थिती देखील मी भाषणांमधून अनेकवेळा मांडली. त्याचवेळी शेतकरी, महिला, युवक अशांसाठी काम करायचे माझे ठरलेले होते. सत्तेत आल्याबरोबर यासाठी मी काम करणे सुरू केले. त्यामुळे आम्हाला यश मिळाले.*

एकनाथ शिंदे म्हणाले की,अमित शाह म्हणाले होते, चट्टान की तरह खडे रहेंगे. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. अडीच वर्षात खूप मोठी मदत आम्हाला दिली. मोदी-शाहांना धन्यवाद देईन. आम्हाला पाठबळ दिले. अडीच वर्षाच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर समाधानी आहे.तर “महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्या योजनांना ब्रेक लागला. त्या कामांना आम्ही गती आणली. त्यामुळे मागे पडलेला आपला महाराष्ट्र हा एक नंबरवर पोहोचला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राज्यात महाराष्ट्राने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला.” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रीतील जनतेचे आभार मानले. “महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत होते, की एकनाथ शिंदे नाराज आहेत वगैरे, पण असे काही नाही. आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, त्याची ऐतिहासिक अशी गणना होते. माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करेन. मला काय मिळाले त्यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.मी काल आधी अमित शहा त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला शिवसेना पक्षाला मान्य असेल,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते. पण त्याऐवजी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच, दुपारी 3 वाजताची पत्रकार परिषद ही अंदाजे 4 वाजता सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट, दादा भुसे, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.*

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला?*

लोकांची भावना साहजिक आहे.. मला मुख्यमंत्री करण्याचे.. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी जे निर्णय घेतले ते त्यांना माहिती आहे.आम्ही महायुतीचे लोकं आहोत. आम्हाला त्यांनी अडीच वर्ष पाठिंबा दिला होता ना.. आता भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याला आणि त्यांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही मोठं विधान शिंदेंनी केलं.

मी आपल्याला सांगू इच्छितो.. की, आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतपर्यंत आम्ही घेतलेले निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेले नव्हते. त्यामुळे आज मी पाहतोय की, राज्याचा प्रंचड असा वेग आहे. राज्य एक नंबरला नेण्याचं काम आम्ही केलंय. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ आम्ही काम केलं, निर्णय घेतले जी सकारत्मकता दाखवली त्यामुळे मतांचा वर्षाव झाला.मी जनतेसाठी एक निश्चिय केला होता की, कॉमन मॅनसाठी काही तरी केलं पाहिजे.सर्व सामान्य कुटुंबाच्या वेदना मी पाहिला आहे.हे सगळं माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मी ठरवलं की, माझ्याकडे जेव्हा असा अधिकार येईल तेव्हा लाडकी बहीण असेल, लाडके भाऊ असेल.. त्यांच्यासाठी काही करेल. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ झालो.आम्ही डोंगराप्रमाणे तुमच्या मागे उभे राहू. त्यांनी मुख्यमंत्री केलं त्यानंतर प्रत्येक दिवस त्यांनी आम्हाला खंबीरपणे मदत केली. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे आहोत.. एवढा मोठा विजय झाला. आजपर्यंतचा हा ऐतिहासिक विजय झाला. जीव तोडून आम्ही काम केलं, निर्णय घेतले. “जे काही आता सगळं या राज्यामध्ये एवढं बहुमत आलं. मग कुठे घोडं आडलं, पण कुठेही घोडं वैगरे आडलेलं नाही. मी अगदी मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही धरून ठेवलं, ताणून ठेवलं.. अशातला माणूस नाही. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती नशीबाने मिळते, असंही शिंदे म्हणाले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!