नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ

नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ

*कोकण Express*

*नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ..!*

*अनेक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे*

*कुडाळमध्ये झाली महत्त्वाची बैठक*

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर वंजारी यांना नियुक्ती देण्यात आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. जिल्हा काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक कुडाळमध्ये घेत तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. पक्ष नेतृत्वाकडे या निवडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कॉंग्रेसमधील एका गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या जवळ जबाबदारी ठेवण्याबाबत ठराव करून देखील या ठरावाला कराची टोपली दाखवल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जवळ हा सामूहिक राजीनामा देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्याच्या मागणी व भावनांना पक्ष किंमत देत नसल्याचा आरोप करत हे राजीनामे दिले आहेत. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाबाबत ज्या पद्धतीने स्थगिती देण्यात आली तशीच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदासाठी देण्यात यावी अशी मागणी देखील कॉंग्रेस च्या या राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सुमारे 35 हुन अधिक पदाधिकारी यांनी हे राजीनामे दिल्याने जिल्हा काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!