*कोकण Express*
*फडणवीस, मोदींवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही : नारायण राणे*
*मुंबई :*
अडीच वर्षे मुख्यमंत्री होतात सगळे खोके मातोश्रीत नेले कोरोना काळात कोणत्या शिवसैनिकाला पैसे दिले? त्यावेळी औषधाचे टेंडर निघायचे त्यातील १५ टक्के आदित्यने घेतले. एक नंबरचा खोटारडा, दगाबाज माणूस आहे. त्यांची काय पात्रता आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री जेलमध्ये गेले, असा मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदींवर बोलतात. त्यांची लायकी आहे का, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले ते अत्यंत असभ्य आणि शिवराळ होती, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा वापरण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते याचा विसर पडला आहे. सुशांत सिंग राजपूत याला का मारले, दिशा सालियन हिने आत्महत्या का केली, सचिन वाझे हा उद्धव ठाकरे यांचा जावई होता का, निलंबित असताना नोकरीवर ठेवले आज जेलमध्ये आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात नवाब मलिक यांचे कुख्यात गुंडांशी संबंध होते, त्याच्या मंत्रिमंडळातील दोन गृहमंत्री जेलमध्ये गेले, असा मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदींवर बोलतात. त्यांची लायकी आहे का?
बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते. माझे शिवसैनिक घरात घुसून मारतील, असे उद्धव ठाकरे म्हणतात. स्वतः कधी कुणाच्या कानफटात मारली आहे का, आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतारा म्हणतात अडीच वर्षे मुख्यमंत्री होतात सगळे खोके मातोश्री कोरोना काळात कोणत्या शिवसैनिकाला पैसे दिले?
त्यावेळी औषधाचे टेंडर निघायचे त्यातील १५ टक्के आदित्यने घेतले. एक नंबरचा खोटारडा, दगाबाज माणूस आहे. रोशनी शिंदे मोदींवर बोलतात, त्या कोण आहेत? त्यांची काय पात्रता आहे, उद्धव ठाकरे उलट तिच्यासाठी ठाण्यात गेले तिला भेटायला. सोबत कुटुंब घेऊन गेले, कारण त्यांना एकटे जाता येत नाही, कुणीतरी सांभाळायला हवे. सभेत त्यांना विशेष खुर्ची दिली कारण ते त्या खुर्ची शिवाय बसू शकत नाही, त्यांचे पाठीचे दुखणे आहे. उद्धव ठाकरे आणि मला एकत्र बसवावे मग बोलू आम्ही कुणाच्यामध्ये हुशारी आहे हे मग ठरवा, असे आव्हानही राणे यांनी दिले.