*कोकण Express*
*महाविकासआघाडी सरकारने ‘चांदा ते बांदा’ योजना बंद करून सिंधुदुर्गावर केला अन्याय; माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा आरोप*
*बँ. नाथ पै सभागृह नुतनीकरणाचे भूमिपुजन माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांंच्या हस्ते संपन्न..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुरू केलेली ‘चांदा ते बांदा’ ही योजना अतिशय चांगली योजना होती. ती बंद करून करून महाविकासआघाडी सरकारने सिंधुदूर्ग जिल्ह्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे. असा आरोप माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केला.
दरम्यान मंत्री असताना श्री. केसरकर यांनी मोठा निधी आणला. आज ते महत्वाची मिटींग असल्यामुळे येवू शकले नाहीत. असे सांगून त्यांनी आमदार दीपक केसरकर यांची पाठराखण केली. तर माजी नगराध्यक्षांनी निधी मोठ्या प्रमाणात असून सुध्दा या ठीकाणी विकास होवू दिला नाही. असाही आरोप त्यांनी केला.
पालिकेच्या बँ. नाथ पै सभागृहाच्या नुतनीकरणाच्या कामाचे भूमिपुजन श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, या ठीकाणी भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणण्यास मदत झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही हट्ट करून निधी मिळवला. मात्र, आत्ताच्या शासनाने एक रुपयाचा निधी दिला नाही. उलट आहे. तो निधी उलट घेण्याचे काम केले. त्यामुळे याचा फटका जिल्हा विकासाला बसणार आहे.
श्री. तेली म्हणाले, या ठीकाणी विरोध असताना सुध्दा संजू परब यांनी चांगले काम केले आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावून त्यांनी येथिल लोकांना एका वर्षाच्या आत व्हीजन असलेला नेता असला की काय होवू शकते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या विकासासाठी यापुढची पाच वर्षे येथिल नागरीकांनी भाजपाला द्यावीत. असे आवाहन त्यांनी केले.