*कोकण Express*
*खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव ; मंगेश लोके*
*जिद्द आणि परिश्रम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला यश नक्कीच…*
*वैभववाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयप्रकाश परब *यांचे प्रतिपादन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने मार्गक्रमण करा. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिकपणे असतील तर यश नक्कीच मिळेल. आपल्याला परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. या मातीशी आपली नाळ जोडून ठेवुन पाय नेहमी जमिनीवर ठेवा. मिळालेल्या चांगल्या गुणांनी हुरळून न जाता योग्य करिअर निवडून त्या दृष्टीने मार्गक्रमण करा. योग्य करीअर निवडले नाही तर दिशाहीन व्हाल. मुलांची आवड महत्वाची आहे आपणाला आवड असणारे क्षेत्र निवडा त्यामुळे तुम्ही झोकून देऊन काम करू शकता. तुमच्यात जिद्द आणि परिश्रम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले.*
*शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांचे वतीने खांबाळे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यकमात मार्गदर्शनपर बोलत होते.*
*समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो याच भावनेतून खांबाळे गावातील मुलांसाठी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या माध्यमातून गेली 25 वर्षे गावातील इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करत आहेत. हेच सातत्य कायम ठेवून त्यांनी सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता.*
*यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश पवार, सहायक गट विकास अधिकारी भोई, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव, भारती बोडेकर, माजी सरपंच विठोबा सुतार, ग्रामसेवक उमेश राठोड, मंगेश कांबळे, दीपक पवार, सूर्यकांत सुतार आदींसह विद्यार्थी व विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रुपेश कांबळे यांनी मानले.