*कोकण Express*
*कणकवलीत पालकमंत्री उदय सामंत यांचा शिवसैनिकांनी साजरा केला जंगी वाढदिवस…!
*पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
माझा पुढील वाढदिवस येईल पर्यंत जिल्ह्यात होणाऱ्या नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी करावा असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत केले.महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखेच्या समोर युवा नेते संदेश पारकर यांच्या वतीने पालकमंत्र्याना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री.सामंत बोलत होते.
यावेळी खास विनायक राऊत,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,आम वैभव नाईक,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,जिल्हाप्रमुख संजय पडते,संदेश पारकर,अतुल रावराणे,आप्पा पराडकर,युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू,राजू शेट्ये,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव,तालुका प्रमुख शैलेश भोगले,डॉ प्रथमेश सावंत,नगरसेवक सुश्नात नाईक,कन्हैया पारकर,राजू राठोड,संदेश पटेल सावंत,संजना कोलते,माधवी दळवी,दिव्या साळगावकर,सुदाम तेली,प्रसाद अंधारी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असून ही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे.त्या बद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा ऋणी आहे.जनतेने टाकलेला विश्वासाला तडा जावू देणार नाही.आम दीपक केसरकर यांनी सुरू केलेली चांदा ते बांदा ही योजना बंद पडली आहे.ही योजना सिंधूरत्न या नावाने सुरू करण्याची विनंती दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.आणि ही योजना चांदा ते बांदा अशीच राबवावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो हे जनतेला न्यात असल्याने जनताच विरोधकांना घरी बसविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
खास. राऊत म्हणाले, पालकमंत्र्याचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी आनंदाचा सोहळा आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली असून ही जबाबदारी सक्षम पणे पार पाडत आहेत.दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याच्या विकासाठी कोट्यवधी चा निधी उपलब्ध करून दिला आहे.चार न.प.च्या व जिल्हा बँक निवडणुकी मध्ये सेना राष्ट्रवादी आघाडीचा विजय होणार आहे.भविष्यात ही या आघाडीच्या विजयाची घोडदौड सुरू राहणार आहे.असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शिवसेना नेते, पदाधिकारी,शिवसैनिकांनी पुष्प गुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.आप्पा पराडकर यांनी उदय सामंत यांना स्वामी समर्थाचा फोटो व तलवार देत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान पालकमंत्र्याचे भाषण सुरू असताना विरोधकांना घरी बसवणार असे म्हणताच महिला शिवसैनिकांनी मॅव मॅव मूडदाबाद अशा घोषणाबाजी करत त्या टीकेचा निषेध केला.