नगरपंचायत निवडणुकीत नवख्या उमेदवाराकडून पराभूत झालेल्या राजन नाईक यांनी रोजगारासाठी विनायक राणेंवर टीका करू नये

*कोकण Express*

*नगरपंचायत निवडणुकीत नवख्या उमेदवाराकडून पराभूत झालेल्या राजन नाईक यांनी रोजगारासाठी विनायक राणेंवर टीका करू नये —- दादा साईल*

*आधी काम दाखवा आणि बक्षीस मिळवा तुमच्या साठी अनोखी स्पर्धा*

*कुडाळ प्रतिनिधी*
आमदारवैभवनाईक जनतेच्या मनावर राज्य करणारे असते तर मग मा. दत्ता सामंत साहेब यांचा उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्याची वेळ आली नसती . आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, दीपक केसरकर यांनी विकास गंगा आणली सांगता त्यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे हे सर्वच भाजपाचे होते. त्यामुळे राज्यातील सर्व सिंधुदुर्ग सह सर्व जिल्ह्यांत त्यांच्या मुळे विकास निधी आला .*

*नितेश राणेंना घरी बसविण्याची स्वप्ने बघण्यापेक्षा तुम्हाला कोणाच्या कारणाम्यांमुळे आणि कर्मांमुळे जनतेने घरी कायमचे बसवीले याचा विचार करावा.*
*संजय पडते आणि सतीश सावंत यांची नारायण राणे येण्यापूर्वी काय प्रतिमा होती हे जनतेला माहिती आहे. खर तर याच लोकांना वाल्याचा वाल्मिकी नारायण राणे साहेब यांनी केला. नारायण राणे साहेब यांच्या विषयी बोलण्याची राजन नाईक यांची खरी औकात नाही. शिवसेनेत राणेसाहेब असताना तुमच्या सह हे दोघे कीती चापलुसी करत होते ते ही जनतेने पाहिलेले आहे. संजय पडतेंची मुलं राणे साहेब यांच्या इंजिनीअरींग काँलेज ला शिकली याची जाणीव तरी ठेवायला हवी होती शिवाय संजय पडते आणि सतीश सावंत यांना रोजगार बरीच वर्षे राणेसाहेबांमुळे मिळाला हे सुद्धा ते विसरले*
*तोंड काळ करण्याची भाषा करता तर राणेसाहेब सेनेतून काँग्रेस मध्ये गेल्या वर दस्तुरखुद्द मा.स्व.श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणात सभा घेऊन देखील कणकवली -मालवण कुडाळ – वेंगुर्ले मध्ये शिवसेनेचे डीपाँझिट गेले त्यावेळी तुम्ही कुठल्या कंपनी चे काळे फासून फीरलात? ते देखील जाहीर करा.*
*संजय पडते पाठीशी राहीले म्हणता उलट विनायक राणें सारखे अनेक कार्यकर्ते राणे साहेब यांचे मुळे पडतेंच्या पाठी राहिले. त्यांचे वाढदिवस आणि तुम्हाला कार्य करताना विनायक राणे यांनी च मदतीचा हात दिला होता पण आज तुम्ही विसरला आणि नाहक टीका करू लागला विनायक राणे ग्रामपंचायत असो वा नगरपंचायत जनतेला दीलेला न्याय आणि त्याची पुण्याई तसेच राणे साहेब यांचे आशीर्वाद यामुळे च कुडाळ शहराचे पहिले नगराध्यक्ष बनले.*
*नगरपंचायत निवडणुकीत विनायक राणे यांच्या समोर तुमच्या आणि इतर पक्षातले स्वतः दिगग्ज समजणारे उमेदवार असताना त्यानी मिळालेला विजय जनता अजून विसरली नाही.*
*_वैभव नाईक शिवसेनेत आल्यापासून तुमच्या सारखे निष्ठावंत शिवसैनिकांची काय दुरवस्था झाली आहे ते सर्व जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत इतर पक्षातून आलेले मंत्री, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी झाले. आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे निष्ठावंत शिवसैनिक मात्र अडगळीत पडले._*
तेव्हा तुम्हाला आमचा मोलाचा सल्ला आहे विनायक राणेंच्या नगरपंचायतीतील अस्तित्व बाबत बोलण्यापेक्षा नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तुमचे अस्तीत्वच कुडाळ शहरातून दुप्पट मतांनी विजयी होऊन कायमचे मिटवीले ते बघा. विनायक राणेसारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांवर टिका करण्यापेक्षा आधी तुमची आणि तुमच्या सारख्या असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांची पक्षातील पत सुधारा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!