*कोकण Express*
*राज्य सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत*
*भाजपचे नेते तथा चंद्रकांत पाटील*
*नाशिक*
नारायण राणे यांनी केलेल्या भाषणाचे समर्थन करत नाही, मात्र एका केंद्रीय मंत्र्याला अटक करणे चुकीचे आहे.सरकारने त्यांना समज देणे गरजेचे होते. राज्य सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात प्रक्षोभक भाषणे होत नाहीत का?, असा उलट सवाल भाजपचे नेते तथा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती, असे वक्तव्य केले होते. यावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री.पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.