*राज्यात स्वातंत्र्य दिनी ग्रामसभा घेण्यास परवानगी*
15 ऑगस्ट रोजी स्वतंत्रदिन साजरा होत असुन, या दिवशी राज्यातील गावांमधून ग्रामसभा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्चभुमीवर हा निर्णय घेण्यात आला.गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला होणारी ग्रामसभा झाली नव्हती. मात्र यंदा कोरोनाविषयक निर्बंध शिथिल करण्यात आल्यानं राज्यातील ग्रामपंचायतींना ही परवाणगी देण्यात आली आहे.