रणजित देसाई यांच्या मार्फत पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूचty

रणजित देसाई यांच्या मार्फत पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूचty

*कोकण Express*

*रणजित देसाई यांच्या मार्फत पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच*

*भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्र प्रथम या घोषवाक्यानुसार सुरू आहे मदत कार्य*

*कुडाळ  ः प्रतिनिधी*

अनेक घरे ज्या पुरामुळे उध्वस्त झाली संसार वाऱ्यावर आले. काही जणांचे अन्नधान्य पुराच्या पाण्याने खराब झालं अश्याना एक आशेचे किरण बनून पुराच्या दुसऱ्या दिवसापासून अनेक कुटुंबा पर्यंत त्या त्या गावातील भाजपा च्या कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन प्रत्यक्ष स्वतः पाहणी करून त्यांना लागणारे साहित्य पुरविण्याचे अविरत कार्य रणजित देसाई व भाजपाचे पदाधिकारी विनायक राणे, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत,दीपक नारकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राजा धुरी, योगेश बेळणेकर, बंड्या सावंत, विजय कांबळी, सचिन धुरी,उमेश धुरी, जोसेफ डॉण्टस , श्रावण धुरी, संतोष डिचोलकर, प्रज्ञेश धुरी, दत्ता कोरगावकर, समीर हळदणकर, सुमन सावंत दीपक खरात, महेंद्र मेस्त्री,वासू भोई, गजानन पवार, प्रमोद दळवी , दीपक काणेकर आदी कार्यकर्ते करत आहेत, अनेक वेळा गाडी जात नसलेल्या ठिकाणी पाणी किंवा पाऊसाची पर्वा न करता पीडित कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे काम ही मंडळी करत आहेत, नानेली सारख्या गावात तर एका कुटुंबा वर पुराने घाला घातला तर दुसऱ्या बाजूने कॅन्सर सारख्या आजाराने अश्या कुटुंबाला एका महिन्यासाठी लागणारे अन्नधान्य पुरवठा करण्याचा रणजित देसाई यांनी नुसता शब्द दिला नाही तर प्रथम कर्तव्य म्हणून 3 टप्प्यात पुरवठा करण्यात आला.

या मदत कार्यात माणगाव , नानेली, आंबेरी, निळेली, भोयाचे केरवडे, साळगाव ,तेर्सेबांबर्डे, बिबवणे ,वाडोस आदी गावातील कुटुंबाना मदत देण्यात आली ज्यात काहींना अन्नधान्य तर काहींना चटई, ब्लॅंकेट आदी वस्तू देण्यात आल्या.

त्याच प्रमाणे देसाई यांनी जिल्हा परिषद मार्फत काहींना घर दुरुस्ती तर काहींची कोंबडी वाहून गेली त्यांना कोंबडीची पिल्ले यासारख्या योजना प्राधान्याने देण्यात येणार असल्याचा शब्दही देण्यात आला.

ज्या कुटुंबा पर्यंत ही मदत पोहोचवण्यात आली त्या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!