* कोकण Express*
*कळणे मायनिंग कंपनी व्यवस्थापन वर गुन्हा दाखल करा व संबंधित अधिकारी असतील त्यांची कसून चौकशी करा श्री दत्ताराम गावकर उपजिल्हाध्यक्ष मनसे सावंतवाडी विधानसभा*
*बांदा ः प्रतिनिधी*
कळणे मायनिंग मधील आजची दुर्घटना ही नैसर्गिक नसून मानव निर्मिती आहे. कळणे मायनिंग कंपनीवर गुन्हा नोंद करा. मनसे ची मागणी.
भरपूर पाऊस आणि त्यात अशी घटना ही प्रशासच्या आणि सबंधित कंपनी याच्या नाकर्ते पणा मुळे घडली आहे. आज गेली 10वर्ष एकाच ठिकाणीसतत उत्तखानांमुळे हा प्रकार घडला आहे.
आतातरी प्रशासन जाग होईल काय? कंपनीची मुजोरी मोडीत काढील काय? हा ही संशोधनाचा विषय आहे. मायनिंग कंपनी चे छेत्र किती आहे. आणि परवानगी किती आहे. हे कोणीही तपासत नाही. कधीही महसूल अधिकारी जाग्यावर जाऊन तपासणी करतांना दिसत नाही. आचार्य आहे ना. जिल्हाधिकारी परवाना पास हे बुकच कंपनी कडे असते.वार कोणताही असो. शनिवार असो की रविवार.1मे असो की 26 जानेवारी पास महसूल अधिकारी यांच्याच सहीने दिला जातो. ह्याची चौकशी होईल काय. कोणीही महसूल अधिकारी करत नाही. उलट मूक पाठींबा दिला आहे.
सदर मायनिंग कंपनी ने जवळ जवळ कळणे नदी पत्राच्याही खाली खोल असे खड्डे मारलेली आहे. अवास्तव रुंद. आडाळी गावाची हद्द सुद्धा तोडलेली आहे. राखीव वनशेत्र सुद्धा तोडलेलं आहे. कळणे मायनिंग आपल्या छेत्रपेक्षा विस्तार करत आहे. आजूबाजूच्या सीमा गलिंगृत केल्या आहेत. उंच डोंगर कापून टाकला आहे. डोंगराला कुठेही रिकामी फेस ठेवलेली नाही आहे. डोंगर च्या कडेला मोठ्ठा मोठ्ठा खड्डा मारून उपसा केलेला आहे. आणि ह्या सगळ्याला प्रशासन अधिकारी, आणि संबंधितकनिष्ठ अधीकारी जबाबदार आहेत.
आणि आज जो प्रकार झाला म्हणजे ती कडा त्या खड्ड्यात डोंगर कोसळला आणि खड्यादतील बेसुमार पाणी आणि तेच पाणी कळणे वस्तीवर आलं आहे.ह्याला संबंधित कंपनी जबादार असून अशी कंपनी तात्काळ बंद करावी.
अशी दरड दरवर्षी पडली जाते. आणि नंतर उन्हाळ्यात हेच खनिज उचललं जात. हा कंपनीचा डाव आहे. त्यामुळे आडाळी गावाच्या डोंगर चोरीस जात आहे. आणि कळणे मायनिंग बेकायदेशीर हा प्रकार करत असून. एखाद्या गावाची सीमा नष्ट करू शकत नाही. तुपामुळे जशी आंध्र सरकारने रेड्डी न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बंधुवर गुन्हा सीमा नष्ट केली असा लावून संपूर्ण खाण बंद केली.तसा करणे सोईचे ठरेलं.
आणि ह्या बाबत मनसे ने निवेदन ह्या अगोदर देऊनसुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्रशासन आता शोध घेणार म्हणून जर सांगत असेल तर हा केवळ दिखावा आहे. प्रशासनाने खड्यात किती पाणी बाहेर येऊन. गावाला त्रास झाला. ह्यावरून खड्डा किती मोठ्ठा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.