कोकणचा कोहिनूर असलेल्या युवा नेेेता कोकण भूमीतून भावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चाहूल म्हणजेच आ. नितेश राणे

कोकणचा कोहिनूर असलेल्या युवा नेेेता कोकण भूमीतून भावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चाहूल म्हणजेच आ. नितेश राणे

*कोकण Express*

*कोकणचा कोहिनूर असलेल्या युवा नेेेता कोकण भूमीतून भावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चाहूल म्हणजेच आ. नितेश राणे…*

*दिलदार मनाचा राजा वाढदिवस अभिष्टचिंतन*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

महाराष्ट्रातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला,तरुणांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्यसम्राट युवा आमदार *नितेशजी चा वाढदिवस* माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच आमदार नितेश राणे यांनी गेल्या सात वर्षात आपल्या आक्रमक आणि धडाडीचे नेतृत्वाची चुणूक दाखवत सिंधुदुर्गाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटविला आहे. प्रचंड मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या संस्कारित कुटुंबात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला व परदेशात उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण ह्या मातीशी आणि जनतेशी कधी एकरूप झाला हे कळलेच नाही. मूळातच आदरणीय मोठ्या साहेबांकडून आक्रमक पणा व अभ्यासु वृत्ती हा वारसा लाभलेल्या नितेशजी नी सर्वसामान्य जनतेच्या हृदयाच्या आतल्या कप्प्यात अढळ स्थान निर्माण केले.

सिंधुदुर्गातील अनेक प्रश्नाला देखील वाचा फोडली मग तो सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरी करण्याचा प्रश्न असो, चिपी विमानतळाचा प्रश्न असो की मच्छीमारांचे प्रश्न विरोधी पक्षाचा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.
विद्यार्थीदशेत असतानाच नितेशजी नी महाराष्ट्र स्वाभिमान संघटना स्थापन करून महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र केले,व अनेक जनहिताच्या प्रश्नासाठी हि युवा संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करु लागली आणि बघताबघता नितेशजी नी तरुणांच्या पाठिंब्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला.अन्याया विरोधात ठामपणे उभा रहाणारा, सामान्य माणसाला केंद्रबिंदु मानुन समाजसेवा करणारा या महाराष्ट्रात दुसरा युवानेता नाही,आदरणीय राणें साहेबांसारख्या उत्तुंग नेतृत्वाची पार्श्वभूमी असूनही नितेशजी नी वारसाहक्काने पदे मिळावीत अशी कधीच अपेक्षा बाळगली नाही.त्यांचे नेतृत्व हे संघर्षातून उभे राहुन, स्वतःला सिद्ध केलेले बावनकशी सोन्या सारखे झळाळते नेतृत्व आहे. भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गात पक्ष संघटना अधिकाधिक बळकट करण्याचे दृष्टीने त्यांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण आहे युवकांचे संघटन ही त्यांची जमेची बाजू असून कणकवली विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क त्यांनी निर्माण केले आहे.

विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत ते कणकवली मतदारसंघ मतदार संघाचे दुसऱ्यांदा आमदार झाले.खरे म्हणजे ज्या वयात माणूस संसारात व मुलाबाळात रमतो त्या वयात नितेशजी नी गोरगरीब जनतेचे संसार उभारण्यात व तरुणांचे भविष्य घडविण्यात स्वतःला वाहून घेतले आहे हा तरुण जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा तुरुंगात गेला जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे जनतेच्या वतीने रस्त्यावर उतरून संघर्ष केला.माजलेल्या नोकरशाही ला आपल्या अभ्यासु पणाने व निर्भीड पणे वठणीवर आणले तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले,सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून जनतेचे हक्क जनतेला मिळवून दिले.दुसरे म्हणजे महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे लाखो लोकांचे मोर्चे निघाले त्याचे खरे जनक नितेशजी आहेत, सर्वप्रथम महाराष्ट्रात फिरून अनेक जिल्ह्यात नितेशजीनी मराठा समाजाचे मेळावे घेतले त्यात हजारो मराठा तरुणांना प्रेरणा मिळाली व मराठा समाज पेटुन उठला आहे.हि चिंगारी नितेशजी नी लावली आणि त्याचे वणव्यात रूपांतर झाले ते श्रेय नितेशजी ना द्यावेच लागेल.गेली सात वर्षे हा तरुण आमदार जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हडे अभ्यासु व आक्रमक आमदार आहेत त्यातील सर्वात वरचा क्रमांक नितेशजी चा आहे असे म्हणायला हरकत नाही.


गेल्या वर्षी व यावर्षी सुद्धा कोरोना या महामारी ने देशात हाहाकार उडाला असताना आणि या महामारीत सगळे लोकप्रतिनिधी घाबरून घरात बसले असता, अशा वेळी या दोन्ही वर्षात नितेशजी कोकणातील जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे होते,,स्वतःचा जीव धोक्यात घालून हा तरूण जनतेमध्ये फिरत होता,, प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तू पासुन वैद्यकीय सुविधांची स्वतः जातिनिशी प्रत्येक वाडीवस्ती वर जाऊन देखरेख करत होता.या महामारी ने जे थैमान घातले होते, यात अनेक तरुण कर्ते पुरुष वैद्यकीय सुविधांच्या अभावी मृत्युमुखी पडत होते कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत होती,,शासन हतबल झाले होते.पूर्ण शासकीय यंत्रणा ठप्प झाली होती.अश्या वेळी संपूर्ण राणे कुटुंबीय पालक या नात्याने जनतेच्या पाठी ठामपणे उभे होते.
गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या या संकट काळात त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचणारा त्यांचे प्रश्न जाणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा हा जनतेचे आमदार आपल्या कार्यकर्तृत्वाने जनतेच्या मनामनात पोचला आहे. निधड्या छातीचा,दिलदार स्वभावाचा, गोरगरिबांचा कैवारी, तरूणाई च्या गळ्यातील ताईत असलेला, सर्वसामान्या मध्ये रमणारा, कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना प्राणापेक्षा जास्त जपणारा, वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा, कोणत्याही संकटाला लिलया सामोरा जाणारा, परिणामांची तमा न बाळगणारा, जनतेशी अत्यंत प्रामाणिक असणारा,विरोधकांनी कितीही टिका केली तरी स्वतःच्या मतांवर ठाम रहाणारा, एकावेळी अनेकांना अंगावर घेऊन चीतपट करणारा,जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा, जनतेसाठी तुरुंगवास भोगणारा असे हे अष्टपैलू नेतृत्व आज अख्खा महाराष्ट्र हया तरुण नेत्याकडे आशेने व अपेक्षेने पहात आहे.


दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा नेता म्हणजे कोकणची शान व महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे,,नितेशजी चा वाढदिवस म्हणजे तरुणाईचा एक उत्सव असतो पण करोना च्या पार्श्वभूमीवर नितेशजी नी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने सोशल मिडिया च्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्या लागत आहेत,,खरे तर नितेशजीं च्या कार्य कर्तृत्वा वर लिहायचे झाले तर रकाने च्या रकाने लिहावे लागतील. तरी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी परमेश्वराने त्यांना दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन भविष्यातील उज्ज्वल महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी देवो हिच परमेश्वराकडे प्रार्थना

🙏🙏🙏🙏

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!