*कोकण Express*
◾ *सकाळचे बातमी अपडेट / १४ मे शुक्रवार*
◾ केंद्र सरकारचा मोठा निर्णय – ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन होणार – याद्वारे देशातील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार – नीती आयोगाची माहिती
◾ दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकाेर्टात आव्हान देण्यात आले आहे – दहावीची परीक्षा घ्यायलच पाहिजे -असे याचिका करते प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांचे म्हणणे आहे –
◾ तर येत्या सोमवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे – याविषयी आणखी काही अपडेट आले तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू –
◾ मराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकारने सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल केली आहे – दरम्यान आता केंद्र सरकार आपली बाजू कशी मांडणार ते पाहण्यासारखे असेल
◾ हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला – त्यानुसासर पूर्व विदर्भात हलका पाऊस असेल ,तर पश्चिम विदर्भात मात्र – मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता आहे.
◾ पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी एकमेव – डेक्कन क्वीन ही गाडी आज शुक्रवारपासून १४ मे पासून रद्द करण्यात आली – त्यामुळे आता पुणे -मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होणार आहे
◾ UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी – २७ जूनला होणारी UPSC ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे – नवीन तारीख लवकरच जाहीर होईल
◾ सार्वजनिक क्षेत्रातील बँकां मधील सुमारे साडेआठ लाख कर्मचार्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यात आला – हा महागाई भत्ता मे, जून आणि जुलै 2021 चा आहे – भारतीय बँक असोसिएशनने याबाबतची घोषणा केली आहे
◾ Google Pay च्या माध्यमातून – आता अमेरिकेतूनही भारतात गुगल पेद्वारे पैसे पाठवता येतील – या आंतरराष्ट्रीय पेमेंट्स सुविधेसाठी गुगलने वेस्टर्न युनियनशी पार्टनरशिप केली आहे
◾ महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे – सध्या बारा कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात – आतापर्यंत तीन कोटी कोरोनाचाचण्या झाल्यात – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.