वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा अनागोंदी कारभार,कार्यालयीन वेळेत फेऱ्या बंद

वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा अनागोंदी कारभार,कार्यालयीन वेळेत फेऱ्या बंद

*कोकण  Express*

*वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा अनागोंदी कारभार,कार्यालयीन वेळेत फेऱ्या बंद…*

*तात्काळ फे-या सुरू करा ; अन्यथा आगाराला टाळे ठोकू, भाजपचा इशारा….*

*वेंगुर्ला ःःप्रतिनिधी* 

एस्. टी.आगाराचा सद्या अनागोंदी कारभार सुरू आहे. अत्यावशक बस बंद आहेत. ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय सुटतेवेळी एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात. कामात सुधारणा करून गाड्या सुरळीत सुरू झाल्या नाहीत तर आगाराला टाळे ठोकू असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने आज गुरुवारी आगारास भेट देऊन निवेदनाद्वारे दिला आहे.

वेंगुर्ले आगारप्रमुख श्री. चव्हाण हे दिर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे सद्या आगाराला कोणच वाली उरला नाही. सद्या वेंगुर्ले एस्. टी.आगारामध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. याबाबत आज भाजपने आगाराला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.चिटनीस समीर कुडाळकर, महिला मोर्चा च्या व्रुंदा मोर्डेकर इत्यादी उपस्थित होते.
लाॅकडाऊनच्या काळात वेंगुर्ले डेपोतुन सकाळी सिंधुदुर्गनगरी ही एस्. टी.ची एकच फेरी सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ग्रामीण भागातील कर्मचारयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोवीड च्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल ते १ मे या कालावधीचे लाॅकडाऊन केले. परंतु त्यामधुन अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. या अत्यावश्यक सेवेमध्ये शासकीय कार्यालय, बॅंका, पोस्ट, आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. ह्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तसेच अती आवश्यक सुविधा पुरविणाऱ्या कार्यालयांसाठी बस सेवा सुरू रहाणार असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. असे असताना त्यांच्याच आदेशाला हरताळ फासण्याचे काम वेंगुर्ले एस्. टी.आगारा कडून होत आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागातील कर्मचारी हे शहरी भागात कार्यालयात येतात, तसेच शहरी भागातील कर्मचारी हे ग्रामीण भागात नोकरी निमित्त जातात. परंतु ग्रामीण भागामध्ये दिवसभरात एकही एस्. टी.ची फेरी चालू नसल्याने त्यांना वेळेवर कामावर हजर राहता येत नाही. विशेषतः महीलांना तर खुपच त्रास सहन करावा लागतो. कारण पुरुष कर्मचारी दुचाकीने जाऊ शकतो परंतु महिला कर्मचारी जी दुचाकी चालवु शकत नाही त्यांचे फार हाल होत आहेत. मुंबई मधील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू रहावी व कर्मचाऱ्यांना वेळेत पोहचता यावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालक व वाहक यांना बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता कामगिरीवर पाठवले आहेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मात्र एस्. टी.सेवेपासुन वंचित रहावे लागते. याचा एस.टी प्रशासनाने विचार करून कार्यवाही करावी असे या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!