*कोकण Express*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात गेले आठ दिवस जनता कर्फ्यु यशस्वी होण्यामागे कणकवलीकर नागरिक व विविध सामाजिक संस्था , संघटना , व्यापारी,पत्रकार नगरपंचायत कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे . हा जनता कर्पू यशस्वी केल्याबद्दल या विविध घटकांचे मी नगरपंचायतचा विरोधी पक्ष गटनेता म्हणून ऋण व्यक्त करत असल्याची भूमिका शिवसेना गटनेता सुशांत नाईक यांनी मांडली.
कणकवली शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु व्हावा अशी मागणी आमच्याकडे नागरिकांकडून केली होती . नगरपंचायतकडे बैठक घेण्याची मागणी केल्यानंतर या बैठकीत सर्वानुमते आठ दिवसांचा जनता कर्फ्यु केला.कणकवली शहरात यापुढेही आपल्याला कोरोनाच्या विरोधात असेच एकजुटीने लढायचे आहे .तसेच विकासाच्या मुद्यावर आम्ही नागरिकांच्या हितासाठी काम करणार आहोत. त्यासाठी आता ज्या पद्धतीने कणकवली करांनी एकजूट दाखवली तशीच एकजूट कायम दाखवावी. गेल्या सात महिन्यात व्यापारी बांधवांचे लॉकडाऊन किंवा कोरोनाच्या प्रसारामुळे आर्थिक नुकसान झाले . तरीदेखील या सर्वांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत जनता कपर्यु यशस्वी केला आहे. कणकवलीतील राजकीय नेते,पत्रकार यांनीही यात मोलाची भूमिका बजावत साथ दिली .समाजातील सर्व घटकांनी सहभाग दर्शवला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत आहे,असे सुशांत नाईक यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.