कोरोना युद्धात ज्येष्ठांचे पानिपत होऊ नये

कोरोना युद्धात ज्येष्ठांचे पानिपत होऊ नये

*कोकण Express*

*कोरोना युद्धात ज्येष्ठांचे पानिपत होऊ नये*

*ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, सचिव रवींद्रनाथ मुसळे यांची मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता सरासरी ६५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ट नागरिक तसेच दिव्यांगाना घरोघरी जावून लस देनेत यावी अशी मागणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना सबबी सांगून जेष्ठ नागरिक तसेच अपंग नागरिकांना घरोघरी जावून लसीकरण करण्यास असमर्थता दर्शवीणाऱ्या केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करून कोरोनाचा धोका याच वयोगटातील लोकांना मोठ्या प्रमाणात असलेने घरोघरी जावून लस देण्याचा विचार करा असा सल्ला दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या विलख्यात ९० टक्के जेष्ठ नागरिकांचे प्राण धोक्यात असलेने न्यायालयाचे सल्लाप्रमाणे सत्वर कार्यवाही व्हावी असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सी. द. उर्फ दादा कुड़तरकर, जिल्हा सचिव रवींद्रनाथ मुसळे यांनी केले आहे. अन्यथा समाजव्यवस्था व कुटुंब व्यवस्था मार्गदर्शनाभावी कोसळून पडेल अन देशात अराजकता निर्माण होईल अशी शंका व्यक्त केली. दरम्यान, काही राजकीय पक्षांनी जेष्ठ नागरिकांचे लसीकरणासाठी घर ते हॉस्पिटलपर्यंत वाहतूक व्यवस्था पुरविण्याच्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे. ही वाहतूक व्यवस्था निवडणूक कार्यपद्धतीप्रमाणे शासनाने करावी .
शेवटी जेष्ट नागरिकांचे कोरोना युद्धात पानिपत हॊवू नये यासाठी शासनाने युद्धपातलिवर मोहिम गतिमान करावी अशी आग्रही मागणी संघाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!